शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

बांधकामांच्या परवानगीसाठी आजपासून ‘बिल्डर झुंबड’

By admin | Published: April 26, 2016 3:41 AM

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील नवीन बांधकामांवरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी उठवल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातवारण आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील नवीन बांधकामांवरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी उठवल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातवारण आहे. वर्षभरानंतर बांधकाम परवानगीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मंगळवारपासून आता बांधकाम आराखडा मंजुरीसाठी केडीएमसीच्या नगररचना विभागात झुंबड उडणार आहे.घनकचऱ्याचे व्यवस्थापन न केल्याने उच्च न्यायालयाने नवीन बांधकामांवर बंदी घातली होती. त्यामुळे वर्षभरात बांधकाम क्षेत्राला ४०० ते ५०० कोटींचा फटका बसल्याचा दावा बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या ‘एमसीएचआय’ने केला आहे. २०१४-१५ मध्ये १६८ बांधकाम आराखड्यांना मंजुरी देण्यात आली होती. यात कल्याणमधील ११० तर डोंबिवलीतील ५८ बांधकामे होती. कल्याण-डोंबिवलीतील घनकचरा प्रकरणातील याचिकेवर १३ एप्रिल २०१५ ला झालेल्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने नवीन बांधकामांना बंदी घातली. तेव्हापासून आतापर्यंत नवीन बांधकाम परवानग्या देण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे बांधकाम क्षेत्राबरोबरच महापालिकेचेही कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. दरम्यान, बांधकामावर निर्बंध येताच ‘एमसीएचआय’ व काही वास्तुविशारदांनी या निर्णयाविरोधात दाद मागितली होती. नवीन बांधकामाला बंदी घातल्यामुळे बेकायदा बांधकामांत वाढ होईल, याकडे लक्ष वेधले होते. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात केडीएमसीने कार्यवाही सुरू केल्याने बंदी उठवण्यात आली आहे. अखेर, वर्षभरानंतर का होईना, न्याय मिळाल्याने बांधकाम व्यावसायिकांत आनंदाचे वातावरण आहे. ‘एमसीएचआय’चे अध्यक्ष प्रफुल्ल शहा यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.