शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

मंत्रिमंडळ निघाले दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर

By admin | Published: February 24, 2016 4:01 AM

मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद आणि लातूर या तीन दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत भीषण परिस्थिती असताना, सरकार उदासीन असल्याची टीका होऊ लागल्याने, सर्व मंत्र्यांनी एक दिवसाचा

मुंबई : मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद आणि लातूर या तीन दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत भीषण परिस्थिती असताना, सरकार उदासीन असल्याची टीका होऊ लागल्याने, सर्व मंत्र्यांनी एक दिवसाचा दौरा करावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत केली. त्यानुसार आता मंत्रिमंडळातील सदस्य मराठवाडा दौऱ्यावर निघाले आहेत.मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्र्यांनी स्वत: गेले पाहिजे, अशी भूमिका घेत, मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकाच दिवशी सर्व मंत्र्यांनी त्या भागात जावे, असे सांगितले. त्यानुसार महसूलमंत्री एकनाथ खडसे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या चौघांनी एकत्र बसून मंत्र्यांचे दौरे निश्चित केले. मार्चच्या पहिल्या आठवड्यात हा दौरा असेल. दौऱ्यावर जाणारे मंत्री प्रत्येक तालुक्यात अधिकाऱ्यांची बैठक घेतील, दुष्काळ निवारणासाठी कार्यरत यंत्रणांशी चर्चा करतील, चारा छावण्यांना भेट देतील, पाणी समस्येचा आढावा घेतील, तसेच शेतकरी, नागरिकांना भेटून नेमक्या समस्या जाणून घेऊन, त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करतील. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ९ मार्चपासून मुंबईत सुरू होत आहे. दुष्काळ निवारणाच्या मुद्द्यावर सरकारची कसोटी लागणार आहे, त्यापूर्वी हा दौरा होणार आहे.अधिकाऱ्यांविरुद्ध मंत्र्यांची तक्रार!दुष्काळ निवारण कार्यात अधिकारी सहकार्य करीत नाहीत, अशी तक्रार काही मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत केली. त्यावर भीषण दुष्काळी परिस्थिती असतानादेखील यंत्रणा प्रभावीपणे काम करीत नसेल, तर कठोर कारवाई करावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला, अशी माहिती सूत्रांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)उशिरा सुचलेले शहाणपणअधिवेशनाच्या तोंडावर राज्यातील मंत्री दुष्काळ दौऱ्यांवर जात असून, हे दौरे म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. तीन महिन्यांपूर्वी असे दौरे केले असते, तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असता, असे मुंडे म्हणाले.शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांवर नाराजजलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधल्याचे समजते. ‘सरकारचे पैसे वाचविणारे उपाय मी अनेकदा सुचवितो, पण त्याची दखल घेतली जात नाही. अधिकारीही ऐकत नाहीत. मी तुम्हाला १६ पत्रे दिली, पण त्याची दखल घेतली गेली नाही,’ अशी तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे बघून केली. काही पत्रांच्या प्रतीही त्यांनी दाखविल्या. शिवसेनेचे दुसरे मंत्री रवींद्र वायकर यांनीही अधिकारी ऐकत नसल्याचा सूर लावला, असे सूत्रांकडून समजते.प्रत्येक बैठकीचा एक डेकोरम असतो, तो पाळला गेला पाहिजे. आपल्याला काही सांगायचे असेल, तर आपण मला नंतर भेटू शकता. इथे बोलणे उचित नाही, अशी समज मुख्यमंत्र्यांनी शिवतारे यांना दिल्याचे समजते. भाजपा-शिवसेना एकमेकांवर टीका करीत असले, तरी मंत्रिमंडळ त्या वादापासून दूर असून, आमच्यात समन्वय असल्याचे मुख्यमंत्री नेहमीच सांगत आले आहेत. त्याला आज तडा गेला.