शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
4
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
5
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
6
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
7
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
8
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
9
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
10
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
11
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
12
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
13
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
14
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
15
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
16
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
17
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
18
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
19
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
20
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

कांदळवन नष्ट करणाऱ्या ६० जणांविरूद्ध अखेर गुन्हे दाखल

By admin | Published: November 04, 2016 5:09 AM

६०० हेक्टरवरील कांदळवनापैकी बहुतांश ठिकाणच्या कांदळवनाचा नाश रेतीमाफियांसह बेकायदेशीर भराव टाकणाऱ्यांनी केला आहे.

ठाणे : जिल्ह्यातील खाडी किनारच्या सुमारे एक हजार ६०० हेक्टरवरील कांदळवनापैकी बहुतांश ठिकाणच्या कांदळवनाचा नाश रेतीमाफियांसह बेकायदेशीर भराव टाकणाऱ्यांनी केला आहे. या वनाच्या संवर्धनासाठी न्यायालयीन आदेशानंतर महाराष्ट्र राज्य राजपत्रातदेखील वनसंवर्धन घोषीत केले होते. यानुसार कांदळवन नष्ट करणाऱ्या सुमारे ६० जणांवर गुन्हे दाखल केल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. याशिवाय कांदळवनाचा नाश करणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करून त्यांविरु द्ध तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत.नवी मुंबई तसेच भिवंडी, ठाणे तालुक्यातील कांदळवनाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याला प्राधान्य देऊन कांदळवनावरील अतिक्र मण किंवा त्याचा नाश करण्यात येत असलेल्या तक्र ारींची तातडीने दाखल घेऊन संबधितांवर गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. याशिवाय कांदळवनाच्या जागांवर कोणत्याही परिस्थितीत कचरा टाकू नये, अशाही सूचना जिल्ह्यातील महापालिकांना दिल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी नुकतीच प्रांताधिकारी व तहसीलदारांची बैठक घेतली आहे. गुन्हे दाखल केलेल्यामध्ये नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, मीरा भार्इंदर या भागातील कांदळवन व जागा नाश करणाऱ्यांचा समावेश आहे. भिवंडी तालुक्यातील शासकीय जमिनीवरील कांदळवन व्याप्ती सुमारे १३७ हेक्टरची आहे. वन संरक्षित (अधिसूचित) करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. ठाणे तालुक्यातील शासकीय जमिनीवरील कांदळवन व्याप्त क्षेत्र सुमारे १४७१ हेक्टर असून ते संरक्षित करण्यासह त्याची अंतिम अधिसूचना काढण्याची कार्यवाही सुरु आहे.(प्रतिनिधी)>कांदळवनाचा ऱ्हास थांबवण्यासाठी लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रसिध्द केले होते. या ठिकाणच्या खारफुटीच्या संरक्षणाची जाणीव त्याना वेळीच झाली असती तर शेकडो एकरमधील कांदळवनाचा बचाव करता आला असता. पण ती आमची जबाबदारी नसून वनविभाग, समाजिक वनीकरण तर कधी मेरी टाईम बोर्डची जबाबदारी असल्याचे उत्तर तेव्हा मिळाले होते. मात्र, आता जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन दोषींवर कारवाईचा बडगा उगारला आहे.