शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

एटीएममध्ये रोकड टंचाई

By admin | Published: April 06, 2017 6:16 AM

नोटांची टंचाई निर्माण झाल्याने मुंबईसह राज्यातील एटीएममध्ये ठणठणाट दिसत आहे.

मुंबई : नोटांची टंचाई निर्माण झाल्याने मुंबईसह राज्यातील एटीएममध्ये ठणठणाट दिसत आहे. तीन-चार एटीएममध्ये जाऊनही रोख रक्कम मिळत नसल्याने लोकांचे हाल होत असून सर्वत्र असंतोष निर्माण झाला आहे. लोकांना ‘कॅशलेस’ व्यवहारास भाग पाडण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून नोटांचा पुरवठा होत नसल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप बँक कर्मचाऱ्यांचे नेते विश्वास उटगी यांनी केला आहे.उटगी म्हणाले की, नोटबंदीनंतर काही एटीएममधील ‘कॅश रिकॅलिब्रेशन सिस्टम’मध्ये बदल करण्यात आला. मात्र अद्याप बहुतेक एटीएममध्ये नव्या २ हजार आणि पाचशे रुपये किंमतीच्या नोटांसाठी आवश्यक सॉफ्टवेअर बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे मोजकेच एटीएम सुरू आहेत. त्यात ‘आरबीआय’कडून पुरेसा नोटांचा पुरवठा होत नसल्याने नोटाबंदीनंतर सुरू केलेले एटीएमही बंद होत आहेत. ‘आरबीआय’ने रोखून ठेवलेल्या नोटांमुळे लोकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लोकांना कॅशलेसकडे नेण्यासाठी ‘आरबीआय’ आणि सरकारकडून जाणीवपूर्वक नोटांची टंचाई निर्माण होत असल्याचा गंभीर आरोपही उटगी यांनी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लोकांचा कॅशलेसवर अद्याप पूर्ण विश्वास नाही. तरीही लोकांना जबरदस्तीने कॅशलेस व्यवहारांना भाग पाडण्यासाठी सरकार नोटांची टंचाई निर्माण करत असल्याचा आरोपही उटगी यांनी केला आहे.तर ‘आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन’चे सहसचिव देविदास तुळजापूरकर म्हणाले की, राज्यात शेतीच्या कामांसह लग्नसराईचा जोर आहे. त्यात सरकारने बँक आणि एटीएममधून काढण्यात येणाऱ्या पैशांच्या मर्यादेवरील सर्व बंधने उठवली आहेत. परिणामी, एटीएमवर अधिक भार पडत आहे. अशा परिस्थितीत गेल्या आठवड्याभरात आलेल्या सुट्ट्यांमुळे बँक अधिक वेळ बंदच होत्या. त्यामुळे नोटांची टंचाई झाली आणि एटीएममध्ये कमी रोख रक्कम भरल्याने आता टंचाईला सामोरे जावे लागत आहे. एटीएममधील नोटटंचाईच्या निषेधार्थ विदर्भात काही ठिकाणी शिवसैनिकांनी एटीएमची आरती करत आंदोलनही केले. (प्रतिनिधी)>बँकांना दंड लावा!एटीएम वापरावरील निर्बंधासाठी आरबीआयने काही राष्ट्रीयीकृत बँकांना ठराविक वापरानंतर ग्राहकांकडून दंड वसुलीस परवानगी दिली होती. मात्र आता गरजेच्या वेळी बँक एटीएम सेवा पुरवण्यात असमर्थ ठरत असल्याने बँकांनाही दंड लावण्याची मागणी तुळजापूरकर यांनी केली आहे.