शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

जात पंचायतींना चाप

By admin | Published: April 14, 2016 4:16 AM

सामाजिक बहिष्काराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी जात पंचायतींच्या माध्यमातून चुकीचे काम करणा-या व्यक्तींना तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद असणारे महाराष्ट्र

मुंबई : सामाजिक बहिष्काराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी जात पंचायतींच्या माध्यमातून चुकीचे काम करणा-या व्यक्तींना तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद असणारे महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण २०१६ हे विधेयक बुधवारी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाले. मात्र, या विधेयकामुळे जात पंचायतींच्या विधायक कामांना धक्का लागणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीच्या पूर्वसंध्येला सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण विधेयक एकमताने मंजूर करून विधीमंडळाने बाबासाहेबांना अभिवादन केले. हे विधेयक राज्यात सामाजिक न्यायाची नवी पहाट आणेल, असा विश्वास दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी व्यक्त केला. (विशेष प्रतिनिधी)गावकी बसवून न्याय देण्यास आता प्रतिबंधया विधेयकातील तरतुदीनुसार एखादी व्यक्ती वा समूहावर सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्यांना तीन वर्षे कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल. जात पंचायत अथवा गावकी बसवून न्याय देण्यास आता कायद्याने प्रतिबंध करण्यात आला आहे. असे करणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन मानले जाईल. जात पंचायतीने दंड सुनावणे, एखाद्याला वाळीत टाकणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. चांदगुडे यांचा लढा यशस्वीसामाजिक बहिष्काराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जात पंचायतींविरोधात लढा उभारला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक घटनांमधील आरोपींवर गुन्हे दाखल झाले. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकमतने त्यांना महाराष्ट्रीयन आॅफ द ईयर पुरस्कारासाठी नामांकित केले होते. आजच्या विधेयकामुळे चांदगुडे यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे.विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर विधान परिषदेत गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी हे विधेयक मांडले. जातपंचायतीच्या माध्यमातून बहिष्कार घालण्याचे ६४ गुन्हे पाच वर्षात दाखल झाले. रायगड जिल्ह्यात यासंदर्भात ६३३ आरोपींना अटक झाली. अशा प्रकारांना आळा घालण्यास हा कायदा करण्यात आला आहे. या प्रकरणांत न्यायालयाने ठोठावलेल्या दंडाची रक्कम पीडितांना देण्यात यावी, अशी सूचना काँग्रेसच्या शरद रणपिसे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली.लोकमतचा पाठपुरावारायगड, नाशिक, नगर आणि परभणी जिल्ह्यातील जात पंचायतींच्या अघोरी व अमानवीय शिक्षेसंदर्भात लोकमतने सातत्याने आवाज उठवून या प्रकरणांचा पाठपुरावा केला होता. विशेषत: रायगड जिल्ह्यातील सामाजिक बहिष्काराच्या घटनांना वाचा फोडून सरकारचे लक्ष वेधले होते.