शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

तूर खरेदीची सीबीआय चौकशी करा : चव्हाण

By admin | Published: May 23, 2017 4:18 AM

राज्यात कमी किमतीत आयात केलेली तूर आधारभूत किमतीने शेतकऱ्यांच्या नावावर विकून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात कमी किमतीत आयात केलेली तूर आधारभूत किमतीने शेतकऱ्यांच्या नावावर विकून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला. या संपूर्ण घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी पत्र परिषदेत केली. ते म्हणाले की, तुरीचे विक्रमी उत्पादन झाले असताना तुरीची खरेदी पारदर्शक पद्धतीने करण्यात सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप करून चव्हाण म्हणाले की, सरकारच्या आकडेवारीनुसार खरीप २०१५ हंगामात महाराष्ट्रात १२.३७ लाख हेक्टर जमिनीवर तूर लावली गेली आणि त्यामधून ४.४४ लाख टन तूर डाळीचे उत्पादन झाले. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आणि शेतकऱ्यांना गेल्यावर्षी मिळालेल्या वाढीव हमी भावामुळे शेतकऱ्यांनी २०१६च्या खरीप हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्के अधिक म्हणजेच १५.३३ लाख हेक्टर क्षेत्रात तुरीची लागवड केली. मात्र,राज्य सरकारच्या उत्पादनाच्या आकडेवारीवरुन कुठेतरी पाणी मुरत असल्याची शंका चव्हाण यांनी व्यक्त केली.राज्य सरकारने सप्टेंबर २०१६ मध्ये जाहिर केलेल्या उत्पादनाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील डाळींचे उत्पादन १२.५६ लाख टन होईल असे जाहिर केले. मार्चमध्ये झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात विधानसभेत ११.७१ लाख टन उत्पादन अपेक्षित असल्याची माहिती देण्यात आली. एप्रिलमध्ये राज्यातील तूरीचे उत्पादन २०.३५ लाख टन होईल असे केंद्र्र सरकारला कळविण्यात आले. त्यामुळे तीन महिन्यात ११.७१ लाख टनावरुन २०.३५ लाख टन कसे वाढले, असा सवाल चव्हाण यांनी केला.