शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
2
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
3
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
4
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
5
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
6
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
7
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
8
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
9
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
10
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
11
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
12
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
14
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
15
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
16
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
17
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
18
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
19
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
20
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story

तलावांवर सीसीटीव्हीची नजर

By admin | Published: January 02, 2017 9:39 PM

सव्वा कोटी जनतेची तहान भागवत असल्याने संवेदनाशील ठरणा-या जलस्त्रोंना अतिरेकी कारवाईचा धोका असतो.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 2 - सव्वा कोटी जनतेची तहान भागवत असल्याने संवेदनाशील ठरणा-या जलस्त्रोंना अतिरेकी कारवाईचा धोका असतो. त्यामुळे अशा संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार धरणक्षेत्रात सुमारे साडेसातशेहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.मुंबईला तानसा, वैतरणा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तुलसी व विहार या तलावांतून पाणीपुरवठा केला जातो. या तलावांवर गस्त ठेवण्यासाठी सुरक्षारक्षक तैनात असतात. मात्र तलाव परिसर मोठा असल्याने ही कुमूक अपुरी ठरते. त्यातच संभाव्य अतिरेकी हल्ल्यामुळे तलाव परिसर संवेदनशील ठरत आहेत. त्यामुळे अखेर सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात वैतरणा तलावाच्या जंगल क्षेत्रात कॅमेरे लावले जाणार आहेत. येथे संगणकावर सुरक्षा नोंदणी प्रणाली कार्यान्वित केली जााणार आहे. यामुळे तलावांबरोबरच मुंबईत मोठ्या जलवा वाहिन्यांवर नजर ठेवता येणार आहे. यासाठी एक कोटी आठ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर झाला असून, लवकरच त्यावर अंमल होणार आहे.