शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
2
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
3
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
4
"घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गंमतीदार किस्सा
5
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
6
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
7
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
8
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
9
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
10
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
11
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
12
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
13
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
14
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
15
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
17
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
18
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
19
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
20
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स

सेन्सॉर बोर्डाविरुद्ध लढा द्यावाच लागेल!

By admin | Published: March 23, 2017 3:31 AM

दहा वर्षांत सेन्सॉर बोर्डमध्ये खूप बदल झाले; मात्र अजूनही सुधारणांना वाव आहे. आम्ही सेन्सॉरशिपबाबत अनेक वर्षे लढा दिला.

पुणे : दहा वर्षांत सेन्सॉर बोर्डमध्ये खूप बदल झाले; मात्र अजूनही सुधारणांना वाव आहे. आम्ही सेन्सॉरशिपबाबत अनेक वर्षे लढा दिला. प्रत्येक पिढीला स्वातंत्र्यासाठी लढा द्यावा लागेल, असे परखड मत ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक महेश भट यांनी व्यक्त केले.डिजिटल युगात चित्रपटाचा आशय विविध माध्यमांतून थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे सेन्सॉर बोर्डचे अस्तित्व काहीसे कमी झाले आहे. मात्र, स्वत:च्या चित्रपटांबाबत वैयक्तिक पातळीवर संवेदनशीलता जोपासण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. ‘लोकमत माध्यम समूहा’तर्फे एनईसीसी, युनिसेफ आणि यूएन वुमेन यांच्या सहयोगाने आयोजित ‘लोकमत वुमेन समीट’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘रोल आॅफ द लाइन्स’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन, दिव्या दत्ता, लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन विजय दर्डा आदी परिसंवादात सहभागी झाले होते.१९८४ मध्ये शबाना आझमी यांच्यासमवेत केलेला ‘अर्थ’ ते २०१७ चा विद्या बालनचा ‘बेगमजान’ हा खूप मोठा प्रवास आहे. ‘उडता पंजाब’च्या पार्श्वभूमीवर ‘बेगमजान’ला सेन्सॉर बोर्डकडून काय कात्री लावली जाईल, याची धाकधूक होती. मात्र, केवळ दोन साधे बदल सुचविण्यात आले, असे त्यांनी सांगितले. विद्या बालन म्हणाली, मी आजवर अनेक भूमिका केल्या; मात्र ‘बेगमजान’मधील भूमिका पेलली आणि जगलीही. महिलांनी आयुष्यात थोडीशी बंडखोरी दाखवायलाच हवी. मनात अनेकदा संताप साठलेला असतो. माझ्या बाबतीतही ‘बेगमजान’ चित्रपट करताना असेच घडले. यातील अनेक संवाद जणू मलाच म्हणायचे आहेत, असे वाटत होते. ‘बेगमजान’च्या संवादांमध्ये क्रौर्य आहे, राग आहे; परंतु तिच्या भावना खऱ्याखुऱ्या आहेत. त्यामुळे हे संवाद म्हणताना अवघडल्यासारखे झाले नाही. (प्रतिनिधी)

महिलांनी ठाम भूमिका घ्यावी - विद्या-महिला ‘नॅचरल गिव्हर्स’ आहेत. त्या नेहमी इतरांचा विचार करतात; पण मला काय वाटते, याचा विचारच त्यांच्या मनाला शिवत नाही. स्वत:च्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट करायची असेल, तर समाज काय म्हणेल? लोक काय विचार करतील, असे प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित होतात. मात्र, महिलांनी स्वत:चे म्हणणे ठामपणे मांडण्याची भूमिका घ्यायला हवी, असे मत अभिनेत्री विद्या बालन हिने व्यक्त केले.