शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट
2
'दगडूशेठ'च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात; भाविकांची झुंबड
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखापतग्रस्त हाताने खेळलेला 'डायमंड लीग'
4
अमेरिकेच्या प्रतिष्ठित हम्फ्रे फेलोशिप प्रोग्रामसाठी विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड
5
लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू तर 1200-1500 जखमी; इस्रायलवर संशय
6
अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जना करण्यासाठी गेलेले दोन कर्मचारी पूर्णा नदीपात्रात गेले वाहून
7
हातगाडी लावण्यावरून चाकू हल्ल्यात एकाचा खून; कोल्हापूरच्या आराम कॉर्नर येथील घटना
8
जळगाव जामोदमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, तरुण जखमी; पोलिसांचा हस्तक्षेप
9
तलावातील पाण्यामध्ये बुडून बाप-लेकाचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील माळहिप्परगा येथील घटना
10
गोळ्या झाडून पोलीस कर्मचाऱ्याने केला पत्नीचा खून; किरकोळ वादातून उचललं टोकाचं पाऊल
11
'पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष, जळगावात जल्लोषात विसर्जन अन् सामाजिक संदेश
12
गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत दणदणाट अन् लखलखाट! कोल्हापुरात तुफान धामधूम
13
“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले
14
'मला मेनोपॉझबद्दल वडिलांनी आधीच..' सुधा मूर्तींनी सांगितला मासिक पाळी अन् मेनोपॉझचा अनुभव
15
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
16
Ganesh Visarjan 2024 Live: पुण्यातील मानाच्या पाचही गणपती बाप्पांचे विसर्जन
17
भारतात वेगाने वाढतीये करोडपतींची संख्या, ₹ 10 कोटी कमावणाऱ्यांच्या संख्येत 63 टक्क्यांनी वाढ
18
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
19
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
20
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...

‘देशातील बाराही बंदरांच्या खासगीकरणाचा केंद्राचा घाट’

By admin | Published: February 12, 2017 1:55 AM

देशात असलेल्या १२ बंदरांचे खासगीकरण करून त्यांच्या मालकीच्या जमिनी बिल्डर्स, बड्या भांडवलदारांच्या घशात घालून त्या जागी हॉटेल्स, रिसॉर्ट बनविण्याचा घाट केंद्र सरकारने

उरण : देशात असलेल्या १२ बंदरांचे खासगीकरण करून त्यांच्या मालकीच्या जमिनी बिल्डर्स, बड्या भांडवलदारांच्या घशात घालून त्या जागी हॉटेल्स, रिसॉर्ट बनविण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. त्यासाठी नव्याने मेजर पोर्ट अ‍ॅथोरिटी कायदा अंमलात आणण्याची तयारी सुरू केली. यामुळे बंदर कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत असल्याने केंद्राच्या या कायद्याला फेडरेशनने विरोध दर्शविला आहेच. मात्र, वेळ पडल्यास विरोधासाठी संघर्ष करण्याचा निर्धार करून देशभरातील बंदरात चक्का जाम करण्याचा कडक इशारा आॅल इंडिया पोर्ट अ‍ॅण्ड डॉक वर्कर्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष केरसी पारेख यांनी जेएनपीटी कामगार मेळाव्यातून दिला. आॅल इंडिया पोर्ट अ‍ॅण्ड डॉक वर्कर्स फेडरेशनशी संलग्न असलेल्या जेएनपीटी कामगार एकता संघटनेच्या वतीने शुक्रवारी जेएनपीटी कामगारांच्या परिसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जेएनपीटीतील भरत म्हात्रे प्रवेशद्वाराजवळील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात जेएनपीटी कामगारांचे प्रश्न आणि फेडरेशनची भूमिका या विषयावर ऊहापोह करण्यात आला. याप्रसंगी आॅल इंडिया पोर्ट अ‍ॅण्ड डॉक वर्कर्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष केरसी पारेख, सेक्रेटरी आर.एम. मूर्ती, कल्पनाताई देसाई, एस.आर. यादव, जेएनपीटी कामगार एकता संघटनेचे अध्यक्ष तथा जेएनपीटीचे माजी कामगार विश्वस्त दिनेश पाटील, अ‍ॅड. विजय पाटील आदी मान्यवर आणि एकता कामगार संघटनेचे पदाधिकारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आॅल इंडिया पोर्ट अ‍ॅण्ड डॉक वर्कर्स फेडरेशनच्या सेक्रेटरीपदी दिनेश पाटील यांच्या निवडीची घोषणा करून त्यांचा सत्कारही या वेळी करण्यात आला. जेएनपीटी कामगारांंनी दिनेश पाटील यांना आणि त्यांच्या संघटनेला जेएनपीटी कामगारांनी बळ द्यावे, भरघोस पाठिंबा द्यावा जेणेकरून फेडरेशनला आणखी ताकद मिळेल. त्यासाठी दिनेश पाटील यांच्या एकता कामगार संघटनेला पहिल्या क्रमांकावर नेऊन येऊ घातलेल्या कामगार ट्रस्टीपदाच्या निवडणुकीत दोन्ही कामगार ट्रस्टी एकता संघटनेचेच निवडून आणा, असे आवाहन केले. त्याचा फायदा कामगारांनाच होईल, असा विश्वासही पारेख यांनी कामगारांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला. दिवंगत कामगार नेते एस.आर. कुलकर्णी यांच्या कार्यप्रणालीच्या आधारावर आणि फेडरेशनच्या पाठिंब्यावर जेएनपीटी कामगारांवरील कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा देत संघर्षास सज्ज असल्याचेही पाटील यांनी मेळाव्यात ठणकावून सांगितले. (प्रतिनिधी)मेजर पोर्ट अ‍ॅथोरिटी कायदा आणण्याची तयारी सुरू केली. १९०८ सालातील कायद्यात फेरबदल करून केंद्रातील भाजपाच्या सरकारने हा कायदा २०१५मध्ये अंमलात आणण्याचा घाट घातला. या कायद्यामुळे नॉनमेजर पोर्टमधील लाखो गोदी आणि बंदर कामगारांच्या सुरक्षिततेवरच गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना वेळेवर वेतन मिळणार नाही. सुविधांपासूनही वंचित राहण्याची वेळ बंदर कामगारांवर येणार आहे. कामगारांना समान काम, समान वेतन मिळावे, अशी मागणी याआधीच फेडरेशनने लावून धरली आहे.