शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
5
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
6
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
7
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
8
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
9
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
10
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
11
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
12
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
13
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
14
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
15
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
16
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
17
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
18
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
19
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
20
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

राज्य आपत्ती निवारण निधीत आता केंद्राचा वाटा ९० टक्के

By admin | Published: March 08, 2015 2:40 AM

राज्यांच्या आपत्ती निवारण निधीतील (स्टेट डिझस्टर रिलिफ फंड) सहभागाचे सूत्र चौदाव्या वित्त आयोगाने बदलले असून यापुढे या निधीत केंद्र सरकारचा वाटा ९० टक्के व राज्यांचा वाटा १० टक्के असणार आहे.

अजित गोगटे - मुंबईराज्यांच्या आपत्ती निवारण निधीतील (स्टेट डिझस्टर रिलिफ फंड) सहभागाचे सूत्र चौदाव्या वित्त आयोगाने बदलले असून यापुढे या निधीत केंद्र सरकारचा वाटा ९० टक्के व राज्यांचा वाटा १० टक्के असणार आहे. परिणामी आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला आपत्ती निवारण निधीसाठी केंद्राकडून एकूण ७,३७६ कोटी रुपये मिळणार आहेत.आधीच्या आयोगांनी स्वीकारलेली पद्धत आणि गेल्या पाच वर्षांत आपत्ती निवारण कामांसाठी करावा लागलेला खर्च विचारात घेऊन आयोगाने देशातील सर्व राज्यांसाठी मिळून आपत्ती निवारण निधीसाठी ६१,२१९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी महाराष्ट्राचा आगामी पाच वर्षांसाठीचा वाटा ८,१९५ कोटी रुपयांचा असेल. त्यात ७,३७६ कोटी रुपये केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून मिळतील व बाकीची ८२० कोटी रुपयांची रक्कम राज्याला घालावी लागेल.सध्या काही ठराविक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींसाठीच या निधीतून खर्च करण्याची तरतूद आहे. अनेक राज्यांनी यात वीज कोसळणे, सर्पदंश,समुद्र किंवा नदीमुळे जमिनीची धूप होणे, दरडी कोसळणे, ढगफुटी, बांबूला फुलोरा येणे इत्यादी आपत्तीकारक घटनांचा समावेश करण्याचा आग्रह धरला होता. परंतु नानाविध प्रकारची नैसर्गिक स्थिती असलेल्या भारतासारख्या देशात सर्वत्र लागू होईल असे आपत्तीचे असे कोणतेही स्वरूप आधीच ठरविणे कठीण असल्याने आयोगाने आपत्तींची सध्याची यादी विस्तारण्याची कोणतीही शिफारस केली नाही. मात्र राज्यसापेक्ष आपत्तीची परिस्थिती हाताळण्यात लवचकिता असावी यासाठी राज्य आपत्ती निवारण निधीतील १० टक्क्यांपर्यंत रक्कम, यादीत नसलेल्या परंतु राज्याला गरजेचे वाटेल अशा आपत्तीसाठी खर्च करण्याची राज्यांना मुभा असावी, असे आयोगाने सुचविले आहे. मात्र राज्यांनी आपल्यादृष्टीने राज्यसापेक्ष आपत्ती आधीच अधिसूचित कराव्यात व त्यासाठी निधी वापराचे निकषही ठरवावेत, असे आयोगाने म्हटले आहे.सध्याच्या व्यवस्थेनुसार काही निवडक वस्तूंवर आकारला जाणारा अधिभार हाच आपत्ती निवारण निधीसाठी पैसे उभे करण्याचा एकमेव मार्ग आहे. परंतु हे अधिभार कालांतराने बंद झाले किंवा वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यावर त्यात सामावून घेतले गेले तर हा मार्ग ही बंद होईल. त्यामुळे सरकारने या निधीसाठी पैसे उभे करण्याचा खात्रीशीर पर्यायी मार्ग शोधावा, असे आयोगाने सुचविले आहे.याच अनुषंगाने आयोगाने असेही म्हटले आहे की, सामान्य लोक व उद्योग विश्वालाही या निधीमध्ये सहभागी करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी कंपन्यांच्या मान्यताप्राप्त ‘सीएसआर’ कामांमध्ये आपत्ती निवारण निधीला दिलेल्या देणग्यांचा समावेश करणे आणि पंतप्रधान मदत निधीप्रमाणे या निधीवरही प्राप्तिकरात सूट देणे, या उपायांवर सरकारने सक्रियतेने विचार करावा.राज्य आपत्ती निधीतील केंद्र, राज्य सरकारचा वाटावर्षकेंद्र सरकार राज्य सरकार२०१५-१६ १,३३५ कोटी १४८ कोटी२०१६-१७ १,४०२ कोटी१५६ कोटी२०१७-१८ १,४७२कोटी१६४ कोटी२०१८-१९ १,५४५ कोटी १७२ कोटी२०१९-२०१,६२२ कोटी १८० कोटी