शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

केंद्राचा दुष्काळनिधी मिळालाच नाही!

By admin | Published: February 02, 2016 4:16 AM

महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थिती हाताळण्याकरिता केंद्र सरकारने गेल्या २९ डिसेंबरला राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून (एनडीआरएफ) ३०५० कोटी रुपये मंजूर केले; मात्र त्यापैकी अद्याप एक छदामही मिळाला नाही

सुप्रीम कोर्टात राज्य सरकारचा दावा : मात्र खडसे म्हणतात, ६३७ कोटी मिळालेनवी दिल्ली/मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थिती हाताळण्याकरिता केंद्र सरकारने गेल्या २९ डिसेंबरला राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून (एनडीआरएफ) ३०५० कोटी रुपये मंजूर केले; मात्र त्यापैकी अद्याप एक छदामही मिळाला नाही, असे राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्राथमिक स्थितीदर्शक अहवालात म्हटले आहे. मात्र, या अहवालाविषयी राज्याचे मदत व पुनर्वसन खाते अनभिज्ञ आहे. आमच्या खात्यामार्फत असा कोणताही अहवाल दिलेला नसून राज्याला १९ जानेवारीपर्यंत ६३७ कोटी मिळाले आहेत, अशी माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी ‘लोकमत’ला दिली.स्वराज अभियान नामक स्वयंसेवी संघटनेच्या जनहित याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि महाराष्ट्रासह ११ राज्यांना नोटीस बजावली होती. यात केंद्र आणि संबंधित राज्यांना दुष्काळग्रस्त भागातील मदतकार्यासंदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार राज्य सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील महालिंग पंदरगे यांनी सादर केलेल्या प्राथमिक स्थितीदर्शक अहवालानुसार राज्य सरकारने गेल्या वर्षी २१ जिल्ह्यातील १५,७४७ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली होती. परंतु केंद्राकडून अद्याप कुठलीही मदत मिळालेली नाही. राज्यात यंदा जूनमध्ये २२८.४ मिमी, जुलैमध्ये १३० मिमी तर आॅगस्ट महिन्यात १६६.९ मिमी पाऊस झाला होता. पाऊस कमी झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले. डिझेल सबसिडी, बियाणे खरेदीवरील सवलत, बागायती आणि अतिरिक्त चारा विकास प्रकल्पांसाठी उचलण्यात आलेल्या पावलांबद्दलही या अहवालात माहिती देण्यात आली आहे. मात्र केंद्राकडून किती पैसा मिळाला याचे उत्तर ‘शून्य’ असल्याचे म्हटले आहे. वास्तविक, हा अहवाल २२ जानेवारी रोजीच सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता. मात्र, तो १ फेब्रुवारी रोजी सुनावणीदरम्यान समोर आला. ६३७.१८ कोटी मिळाले!केंद्राने १३ जानेवारी रोजी राज्याला ३०४९.३६ कोटी मंजूर केले. त्यातले ५६३ कोटी राज्याला पूर्वीच मिळालेले होते. ते वजा करुन उर्वरित २५४८.७३ कोटींपैकी ६३७.१८ कोटी रुपये १९ जानेवारी रोजी राज्य सरकारला मिळाले आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव अशोक आत्राम यांनी लोकमतला दिली........................अहवालाची चौकशी करु - खडसेमदत व पुर्ववसन विभागाने कोणताही अहवाल दिलेला नाही. केंद्र सरकारकडून १९ जानेवारी रोजी ६३७ कोटी मिळाले आहेत. मात्र केंद्राच्या मदतीची वाट न पहाता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत वाटप करुन टाकली आहे. १५ डिसेंबर २०१५ पर्यंत प्रत्यक्षात शेतकऱ्यांना १८४४.०४ कोेटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. आता सर्वाेच्च न्यायालयात वकिलांनी कोणती माहिती दिली याची चौकशी केली जाईल असेही खडसे यांनी स्पष्ट केले.................वकील काय म्हणतात?सर्वोच्च न्यायालयात सादर झालेल्या प्राथमिक स्थितीदर्शक अहवालाबाबत विचारले असता अ‍ॅड. पंदरगे म्हणाले, हा प्राथमिक अहवाल असून २२ जानेवारीपर्यंत जी माहिती आमच्याकडे होती ती सादर करण्यात आली. लवकरच सुधारित अहवाल सादर करण्यात येईल.(लोकमत न्यूज नेटवर्क)