शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
3
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
4
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
5
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
6
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
7
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
8
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
9
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
10
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
11
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
12
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
13
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
15
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
16
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
17
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
18
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
19
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
20
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा

चैत्र वणवा संपेना...

By admin | Published: April 12, 2017 4:23 AM

उष्णतेच्या लाटेने पुन्हा महाराष्ट्र होरपळत असून, मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही बहुतांश शहरांमधील पारा ४० अंशांच्या पुढे होता. चैत्रात अवतरलेल्या या वैशाख वणव्याने जिवाची

पुणे : उष्णतेच्या लाटेने पुन्हा महाराष्ट्र होरपळत असून, मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही बहुतांश शहरांमधील पारा ४० अंशांच्या पुढे होता. चैत्रात अवतरलेल्या या वैशाख वणव्याने जिवाची काहिली होत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.देशात सौराष्ट्राच्या किनारपट्टीचा भाग तसेच कच्छ परिसरात उष्णतेची लाट आली आहे़ तमिळनाडूचा काही भाग, आसाम, मेघालय, पश्चिम राजस्थान, गुजरात, कोकण, गोवा, तेलंगणा, रायलसीमा आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागात सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशांनी कमाल तापमानात वाढ झाली आहे़ राज्यात सर्वांत जास्त विदर्भ प्रभावित झाला आहे. उपराजधानी नागपूरसह सर्व प्रमुख शहरांमधील पारा ४० अंशांच्या पुढेच आहे. सूर्य आग ओकत असल्याने दुपारच्या वेळी सन्नाटा असतो. विदर्भापाठोपाठ खान्देश, मराठवाडादेखील होरपळून निघाला आहे. कोकण, गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ कधी नव्हे ते पश्चिम महाराष्ट्रातील पाराही चढला आहे. बागायती पट्ट्यातील सातारा, सांगलीत तापमानदेखील ४० अंशाच्या पुढे आहे प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) :पुणे ३९़६, अहमदनगर ४१़६, जळगाव ४१़२, कोल्हापूर ३९़५़, महाबळेश्वर ३५़५, मालेगाव ४०़८, नाशिक ३९़९, सांगली ४१, सातारा ४०, सोलापूर ४१़९, मुंबई ३४, अलिबाग ३५़१, रत्नागिरी ३२़३, पणजी ३४़२, डहाणू ३३़५, उस्मानाबाद ४०़८, औरंगाबाद ३९़४, परभणी ४१़५, नांदेड ४१़५, अकोला ४१़५, अमरावती ४०़़२, बुलढाणा ३८़६, ब्रम्हपुरी ४१, चंद्रपूर ४२़६, गोंदिया ३९़५, नागपूर ४१, वाशिम ३८, वर्धा ४१़२, यवतमाळ ४०़ पुढील दोन दिवस तापमान वाढणार‘‘सौराष्ट्र आणि कच्छ परिसरात उष्णतेचे लाट आली असून या वाळंवटी प्रदेशातून येणारे ४० अंश सेल्अिस तापमान असलेले उष्ण वारे महाराष्ट्रात येत आहेत़ त्यामुळे पुढील किमान दोन दिवस राज्यातील तापमान चढेच राहील. या वाऱ्यांची दिशा व त्या त्या ठिकाणचे भौगोलिक स्थान यानुसार तापमानात चढउतार होऊ शकतो. - डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ