शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोकणातले चाकरमानी वाहतूक कोंडीच्या कचाट्यात; मुंबई-गोवा, मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 02:00 IST

गणेश विसर्जन झाल्यानंतर शनिवारी सायंकाळपासूनच चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला.

महाड/माणगाव : गणेश चतुर्थीसाठी कोकणात गेलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासातही वाहतूककोंडी आणि जोरदार पावासाने ‘विघ्न’ आणले आहे. कोकण रेल्वेचे कोलमडलेले वेळापत्रक आणि मुंबई-गोवा, मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूककोंडीमुळे कोकणातले चाकरमानी वाहतूककोंडीच्या कचाट्यात सापडले आहेत.

गणेश विसर्जन झाल्यानंतर शनिवारी सायंकाळपासूनच चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. महामार्गाची दुरवस्था आणि वाहतूककोंडीमुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. मुंबई ते महाडपर्यंतच्या प्रवासाला तब्बल १६ ते १७ तास लागले होते. रविवारीही त्याची पुनरावृत्ती झालेली दिसून आली.

शनिवारी मध्यरात्री महाडपासून लागलेल्या वाहनांच्या रांगा रविवारी दुपारनंतर वाढतच गेल्या. कशेडी घाटाला पर्यायी मार्ग असलेला तुळशी खिंडमार्ग खचल्याने, हा मार्ग गेल्या तीन दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कोंडीत आणखीनच भर पडली.

चौपदरीकरणामुळे मंदावली गतीमुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुसºया टप्प्याचे (इंदापूर ते कशेडी घाट) काम माणगाव तालुक्यातील इंदापूर ते वडपाले दरम्यान सुरू आहे. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच माणगाव शहरातून, तसेच लोणेरे, महाड येथूनच वाहतूक कोंडीला सुरुवात झाली.ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलीस यंत्रणेने पर्यायी मार्ग खुले करून दिल्याने वाहन चालकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला, तसेच माणगाव, लोणेरे व इंदापूर शहरातून दुभाजकाचा वापर केल्याने वाहतूककोंडी कमी होण्यास मदत झाली.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी