शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

निवडणुकीचा सागरी सेतू पार करण्याचे आव्हान

By admin | Published: October 23, 2016 1:51 AM

महत्वाकांक्षी सागरी मार्ग प्रकल्पाच्या वाटेतील एक-एक अडचण दूर होत आहे. गेली काही वर्षे सरकारी लालफितीत अडकलेला हा प्रकल्प महापालिका निवडणुकीत प्रचाराचा

मुंबई : महत्वाकांक्षी सागरी मार्ग प्रकल्पाच्या वाटेतील एक-एक अडचण दूर होत आहे. गेली काही वर्षे सरकारी लालफितीत अडकलेला हा प्रकल्प महापालिका निवडणुकीत प्रचाराचा मोठा सेतू ठरु शकतो. त्यामुळे सागरी सेतूच्या मार्गातील सर्व सरकारी अडथळे मार्गी लावण्यासाठी भाजपाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार या प्रकल्पाचा पाया रचण्यासाठी भूतांत्रिक सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. मात्र यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने आचारसंहितेपूर्वी हे काम पूर्ण करुन घेण्याचे आव्हान भाजपापुढे आहे.२०१२ मध्ये नरीमन पॉइंट ते कांदिवलीपर्यंत सागरी सेतू तयार करण्याचा प्रस्ताव तयार झाला. मात्र महापालिकेची दुसरी निवडणूक येऊन ठेपली, तरी या प्रकल्पाचा बार अद्याप उडविण्यात आलेला नाही. या प्रकल्पाचे काम निवडणुकीपूर्वी सुरू करण्यासाठी शिवसेना-भाजपा युतीचे एकत्रित प्रयत्न सुरू होते. मात्र आता या मैत्रीमध्येच फूट पडल्यामुळे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे या प्रकल्पासाठी बळ लावत आहेत. विशेष म्हणजे राज्यात सत्तेवर आल्याने भाजपाने हा प्रकल्प आपल्याकडे खेचून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. त्यानुसार गेल्या महिन्याभरात एका पाठोपाठ एक असे अनेक सरकारी परवानगी व ना हरकत प्रमाणपत्र या प्रकल्पाला मिळाली आहेत. त्यामुळे हा सेतू बांधण्यासाठी पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे. यामध्ये या प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या बोगद्याच्या मार्गावर प्रत्येक शंभर मीटरवर एकूण १६६ कुपछिद्रे पाडण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी हे महत्वाचे असून तीन महिन्यांमध्ये म्हणजेच जानेवारी २०१७ पर्यंत हे काम मार्गी लागेल. परंतु तत्पूर्वी आचारसंहिता जाहीर झाल्यास भाजपाची गोची होणार आहे. (प्रतिनिधी)हे अडथळे पारया सर्वेक्षणासाठी आवश्यक परवानगी व ना हरकत प्रमाणपत्र पालिकेला नुकत्याच मिळाल्या आहेत. यामध्ये उच्च स्तरीय समिती, महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीझेडएमए), भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या परवानगींचा समावेश आहे.३३ कि़मी. चा प्रस्तावित सागरी सेतू प्रत्यक्षात आता २९.२२ कि़मी. असणार आहे. मरीन ड्राईव्ह ते प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते कांदिवली असा हा सागरी मार्ग असणार आहे. या प्रकल्पासाठी दक्षिण मुंबई ते वांद्रे वरळी सी लिंकपर्यंत ९.९८ कि़मी. च्या पट्ट्यावर भूतांत्रिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील या कामासाठी आठ कोटी ४३ लाख रुपये खर्च होणार आहेत.