शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
4
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
5
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
6
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
7
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
8
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
9
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
10
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
11
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
12
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
13
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
14
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
15
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
16
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
17
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
18
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
19
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
20
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

नोटांवरील बंदीला हायकोर्टात आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2016 6:27 AM

पाचशे व एक हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देत, दोन ज्येष्ठ वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली

मुंबई : पाचशे व एक हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देत, दोन ज्येष्ठ वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. केंद्र सरकारने अत्यंत घाईने निर्णय घेऊन सामान्यांची प्रचंड गैरसोय केली असल्याचे याचिकेत म्हटले आहे.अ‍ॅड. जमशेद मिस्त्री व अ‍ॅड. जब्बार सिंग यांनी दिवाळी सुटीकालीन खंडपीठापुढे याचिका दाखल केली. त्यात अनेक प्रश्न उपस्थित होणार असल्याने, ही याचिका नियमित खंडपीठापुढे सादर करण्यात यावी, असे निर्देश न्या. एम. एस. कर्णिक यांनी याचिकाकर्त्यांना दिले.रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने (आरबीआय) २ नोव्हेंबरला अधिसूचना काढून सर्व राष्ट्रीयकृत बँकांना त्यांच्या एटीएममध्ये भरण्यात येणाऱ्या एकूण रकमेपैकी १० टक्के रक्कम १०० रुपयांच्या नोटांनी भरण्यात यावी, असा आदेश पारित केला. हे केवळ प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार असल्याचेही आरबीआयने अधिसूचनेत नमूद केले आहे. मात्र, त्यानंतरही ५०० व १००० च्या नोटा चलनातून रद्द करण्याची सरकारने घाई केली. कायद्यानुसार, सरकारला यासाठी वटहुकूम जारी करणे आवश्यक आहे. त्यानंतर, त्याची अंमलबजावणी करायला हवी होती, असा युक्तिवाद अ‍ॅड. मिस्त्री यांनी केला. १९७८ मध्ये आणीबाणीच्या काळात ‘द हाय डिनॉमिनेशन बँक नोट्स अ‍ॅक्ट, १९७८’ कायदा मंजूर करण्यात आला. या कायद्यांतर्गत नोटा व्यवहारातून रद्द करण्यापूर्वी सरकारने वटहुकूम काढणे बंधनकारक आहे. सरकारला वटहुकूम काढायचा नव्हता, तर त्यांनी आधी कायद्यात सुधारणा करायला हवी होती, असेही मिस्त्री यांनी उच्च न्यायालयाला सांगितले. (प्रतिनिधी)