शहरं
Join us  
Trending Stories
1
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
2
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?
3
ही आहेत चार प्रभावशाली कुटुंब, ज्यांच्याकडे आहे तिरुपतीच्या पूजेची जबाबदारी, एवढं मिळतं मानधन, आहे कोट्यवधीची संपत्ती
4
Telegram सीईओ Pavel Durov दबावाला बळी पडले? IP Address, नंबर शेअर करणार!
5
तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त
6
“विरोधकांनी राजकारण करायची गरज नाही”; अक्षय शिंदे एन्काउंटरवर रामदास आठवले थेट बोलले
7
Akshay Kumar : "आवाज केला असता तर गोळ्या घातल्या असत्या"; अक्षय कुमारने सांगितला चंबळचा थरारक अनुभव
8
रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत; कंगना राणौतची मोठी मागणी
9
T20 World Cup 2024 : 'स्वप्न'पूर्तीसाठी टीम इंडिया सज्ज! 'मन' खूप झालं आता 'जग' जिंकण्यासाठी हरमन है तय्यार
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ठरणार भवितव्य
11
शेअर बाजारावर बॉट्सचा ताबा, FII ट्रेडर्सनं अल्गोरिदममध्ये फेरफार केला; ५९००० कोटींची कमाई : SEBI
12
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार
13
"मी शरद पवारांना दैवत मानत आलोय", अजित पवार सुप्रिया सुळेंवर का भडकले?
14
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
15
पाकिस्तान क्रिकेटला लवकरच 'अच्छे दिन'! कोच कर्स्टन यांना विश्वास; खेळाडूंसमोर ठेवल्या ३ अटी
16
KL राहुल मर्जीतला; टीम इंडियात सुरुये Sarfaraz Khan ला रिलीज करण्याचा विचार
17
Monkeypox : टेन्शन वाढलं! ज्याची भीती होती तेच घडलं; भारतात पोहोचला मंकीपॉक्सचा खतरनाक व्हेरिएंट
18
IND vs BAN: "...तर अश्विनला आधीच निवृत्ती घ्यायला लावली असती"; माँटी पानेसारचे मत
19
Munawar Faruqui buys Flat in Mumbai: मुनव्वर फारुकीने मुंबईत खरेदी केला कोट्यवधींचा फ्लॅट, कुठून होते इतकी कमाई?
20
नवीन मोबाईलची खरेदी अन् आयुष्याचा शेवट! मित्रांनीच केला घात, पार्टी न दिल्याने तरुणाची हत्या

आव्हान जलस्रोत टिकविण्याचे

By admin | Published: October 05, 2016 5:36 AM

येत्या काळात जागतिक हवामान बदलातील वाढत्या अनिश्चिततेमुळे पाण्याची उपलब्धता ही नियोजन संस्थांसमोरील राष्ट्रीय समस्या असेल

पुणे : येत्या काळात जागतिक हवामान बदलातील वाढत्या अनिश्चिततेमुळे पाण्याची उपलब्धता ही नियोजन संस्थांसमोरील राष्ट्रीय समस्या असेल. सध्या अस्तित्वात असलेले जलस्रोत टिकविणे आव्हानात्मक असणार आहे. हे जलस्रोत शाश्वत करण्यासाठी नवीन व्यवस्थापन धोरण अवलंबण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी मंगळवारी येथे केले.खडकवासला येथील केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्राच्या (सीडब्ल्यूपीआरएस) शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रम अन्सारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी केंद्रीय जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवनमंत्री उमा भारती, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. संजीव कुमार बलियान, पालकमंत्री गिरीश बापट, केंद्रीय जलस्रोत विभागाचे विशेष कार्याधिकारी डॉ. अमरजित सिंग, मुख्य पोस्टमास्टर जनरल एस. सी. अग्रवाल, संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एम. के. सिन्हा व्यासपीठावर उपस्थित होते. टपाल विभागाने ‘सीडब्ल्यूपीआरएस’वर काढलेले तिकीट, तसेच संस्थेवरील कॉफी टेबल बुक आणि सरदार सरोवर प्रकल्पावरील संशोधन पुस्तिकेचे प्रकाशन उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. देशाला विविध घटकांमुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे सांगून अन्सारी म्हणाले की, ‘पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी पाण्याचा वापर सुयोग्य पद्धतीने करण्याचे आव्हान आहे. अस्तित्वात असलेल्या जलस्रोतांच्या तुलनेत झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, शहरी जलपुनर्प्रक्रियेतील अल्प गुंतवणूक आणि भूगर्भातील पाण्याचा होत असलेला बेसुमार उपसा, यामुळे पाणीप्रश्न निर्माण होऊ लागला आहे. देशातील अनेक नद्यांमधील पाणी पिण्यायोग्य नाही. त्यासाठी जलस्रोतांचे योग्य नियोजन करण्याचे धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करायला हवी. पर्यावरणाचा समतोल टिकवून ठेवत जलसंचय, जलसिंचन, ऊर्जा निर्मिती करता येईल, अशा प्रकारच्या धरणांची रचना तयार करण्याचे आव्हान असल्याचे उमा भारती यांनी सांगितले. (प्रतिनिधी)