शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

चंद्रचूड यांनी लोकशाहीचा खून करण्यामध्ये सहकार्य केले; पृथ्वीराज चव्हाणांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 10:07 IST

आमदार अपात्रता प्रकरणाचा उल्लेख करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सेवानिवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.   

Maharashtra News: विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप जोरात सुरू झाले आहे. यातच आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सेवानिवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. चंद्रचूड यांनी लोकशाहीचा खून करण्यात सहकार्य केले, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेच्या अध्यक्षाकडे हा निर्णय घेण्यास सोपवले होते. त्याला आव्हान देणाऱ्या याचिका आणि मूळ पक्ष आणि चिन्ह वाद सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट आहे. याच मुद्द्यांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाण यांनी सेवानिवृत्त न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्यावर टीका केली. 

धनंजय चंद्रचूड यांच्याबद्दल चव्हाण काय बोलले?

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "चंद्रचूड यांना लोकशाही बळकट करण्याची संधी असताना त्यांनी अत्यंत सुवर्णसंधी गमावली. मला वाटतं की, आता ते माजी सरन्यायाधीश आहेत. आम्हाला त्यांचा आदर आहे. त्यामुळे फार जास्त बोलत नाही. कारण चुकून जास्त शब्द जाईल. काय बोलावं मला माहित नाही. खरं म्हणजे त्यांनी लोकशाहीचा खून करण्यामध्ये सहकार्य केलं", अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी सेवानिवृत्त सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर केली. 

'आक्रस्ताळेपणा का सुरूये', भाजपचे उत्तर 

भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या टीकेला उत्तर दिले. ते म्हणाले, "का एवढा आक्रस्ताळेपणा यांचा सुरू आहे, मला कळत नाही. पराभव तर या देशामध्ये, राज्यामध्ये अनेक पक्षांचे, अनेक नेत्यांचे झाले आहेत. पण, एवढा जिव्हारी घाव लागलाय की, न्यायमूर्तींवर पण आरोप तोही लोकशाहीचा खून केल्याचा करणे हे जरा अतिच होत आहे", असे म्हणत प्रवीण दरेकर यांनी विरोधकांवर पलटवार केला.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस