शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; हाती कागद घेऊन खतांच्या किंमतीच वाचल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 13:05 IST

Loksabha Election 2024 - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात उद्धव ठाकरेंनी शेतकरी सन्मान निधीवरून भाजपावर टीका केली. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई - Chandrakant Patil on Uddhav Thackeray ( Marathi News ) यावेळच्या निवडणुकीत ज्याला जे काही तोंडात येईल ते बोलतोय. आकडे माहिती करून घ्यायची नाही. उद्धव ठाकरेंनी विदर्भातील सभेत हास्यास्पद आरोप पंतप्रधानांवर केला. शेतकरी १ लाखाचं खत घेतात, त्यावर १८ टक्के GST म्हणजे १८ हजार घेतात. त्यातलेच ६ हजार तुम्हाला परत देतात असं विधान केले होते. त्यावर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंनी कधी शेती केलीय का?, खतांच्या किंमती माहिती आहे का? खतांवर किती जीएसटी लागतो हे माहिती आहे का असा प्रश्न केला. 

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, खतांवर ५ टक्के जीएसटी लागतो आणि तो पुरवठादारापासून थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचेपर्यंत इतका कमी होतो, समजा १ लाखाचं खत आहे, त्यावर ५ हजार जीएसटी असते, तेव्हा शेतकऱ्यांपर्यंत येईपर्यंत तो ३००-४०० रुपये होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, शेतकरी सन्मान निधीतून ज्या शेतकऱ्यांना ६ हजार मिळतात तो अल्पभूधारक शेतकरी, गरीब, मजूर शेतकऱ्यांना मिळतात. त्याला १ लाखाचे खत घ्यावे लागत नाही. ४५ किलोची एक बॅग शेतकरी घेतो तेव्हा त्याला २६६ रुपये द्यावे लागतात. त्यावर कंपनीला अनुदान म्हणून १५६१ रुपये सरकारला द्यावे लागतात, त्यामुळे १९०० चं पोतं शेतकऱ्यांना २६६ रुपयाला मिळते असं त्यांनी म्हटलं.

तसेच शेतीबद्दल काय माहिती नसताना हे बोलणं, १ लाखाचं खत घेणारा हा किती मोठा शेतकरी आहे त्याला शेतकरी सन्मान निधीतून पैसे मिळत नाहीत. काहीही बोलायचं, शेतकऱ्यांना आणि लोकांना भ्रमित करायचे यातून काहीही साध्य होणार नाही. रासायनिक खतांवर ५ टक्के जीएसटी आहे. प्रत्यक्षात १९०० रुपयांचं पोतं २६६ रुपयाला घ्यावे लागते. त्यामुळे तुमच्यानिमित्ताने शेतकऱ्यांना या गोष्टीची माहिती मिळाली असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

गेल्या १० वर्षात किती शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालंय? किती शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळालेत? शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची दानत भाजपात नाही. विदर्भ हा विकासात मागे राहिला आहे. १० वर्ष तुम्ही केंद्रात होता, मधलं अडीच वर्ष सोडले तर गेल्या १० वर्षात विदर्भाचा विकास का केला नाही. मी मुख्यमंत्री असताना २ लाखापर्यंत कर्जमुक्त केले होते. समजा शेतकऱ्यांनी वर्षाला १ लाखाचे खत घेतले, त्यावर १८ टक्के जीएसटी, म्हणजे १ लाखावर १८ हजार कुणाच्या खिशातले जातात, त्याच्यातले ६ हजार शेतकऱ्यांना देतात, मग उरलेले १२ हजार कुणाच्या खिशात जातात असं विचारतात, तुमचाच खिसा कापून तुम्हाला भीक देतायेत आणि त्यावर उपकार केल्याचा आव आणतायेत असं विधान उद्धव ठाकरेंनी केले होते.  

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाFarmerशेतकरीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४