शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

Coronavirus Maharashtra Updates: “एक बेड द्या नाहीतर त्यांना इंजेक्शन देऊन मारून टाका” वडिलांना तडफताना पाहून मुलाने फोडला टाहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 10:39 IST

Coronavirus Maharashtra Updates: चंद्रपूरातील एका तरूणाला कोरोना पीडित वडिलांच्या उपचारासाठी २४ तास महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या अनेक हॉस्पिटलच्या फेऱ्या मारल्या.

ठळक मुद्दे वडिलांच्या उपचारासाठी २४ तास महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या अनेक हॉस्पिटलच्या फेऱ्या मारल्या.रुग्णांची संख्या वाढत असल्याने याठिकाणी आरोग्य सेवा अपुऱ्या पडत आहेत.आपल्या वडिलांना रुग्णवाहिकेत तडफताना पाहून सागर खूप निराश झाला

कोरोना व्हायरसच्या महामारीनं महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार विविध प्रयत्न करत आहेत. नाईट कर्फ्यू लावला तरी कोरोना परिस्थिती भयंकर झाली आहे. यात चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जो ऐकून परिस्थिती किती गंभीर झाली आहे त्याचा अंदाज लावता येऊ शकतो.

चंद्रपूरातील एका तरूणाला कोरोना पीडित वडिलांच्या उपचारासाठी २४ तास महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या अनेक हॉस्पिटलच्या फेऱ्या मारल्या. परंतु त्याला कोणतीही मदत मिळाली नाही. त्यानंतर मुलाने माझ्या वडिलांना बेड द्या नाहीतर त्यांना मारून टाका असं नाईलाजाने म्हटलं. चंद्रपूरात राहणाऱ्या सागर किशोर नाहर्शीवारचे वडील खूप आजारी होते. वडिलांच्या उपचारासाठी मुलाने महाराष्ट्रासह शेजारील तेलंगाणा राज्यातल्या हॉस्पिटलच्या फेऱ्या मारल्या. परंतु कुठेही उपचार झाले नाहीत.

सागर त्याच्या वडिलांना घेऊन ८५० किमी दूर मुंबईहून चंद्रपूरला गेले होता. मात्र रुग्णांची संख्या वाढत असल्याने याठिकाणी आरोग्य सेवा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे २४ तास हॉस्पिटल सेवा बंद केली आहे. दुपारी ३ वाजल्यापासून सागर त्याच्या वडिलांना घेऊन हॉस्पिटलच्या चक्करा मारत आहे. पहिल्यांदा चंद्रपूरातील वरोरा येथील हॉस्पिटलला घेऊन गेला पण तिथे बेड मिळाला नाही. त्यानंतर अनेक खासगी रुग्णालयात नेलं. तिथेही जागा शिल्लक नव्हती. रात्री दीडच्या सुमारास तो वडिलांना घेऊन तेलंगाणाला गेला. पण तेथेही उपचार होऊ शकले नाहीत. सकाळी पुन्हा तो महाराष्ट्रात पोहचला. सध्या त्याचे वडील एम्ब्युलन्समध्येच आहे.

आपल्या वडिलांना रुग्णवाहिकेत तडफताना पाहून सागर खूप निराश झाला. एम्ब्युलन्समधील ऑक्सिजनही आता संपणार आहे. त्यामुळे हताश झालेला सागर प्रशासनाकडे विनवणी करू लागला आहे की, माझ्या वडिलांना उपचारासाठी बेड द्या नाहीतर त्यांना इंजेक्शन देऊन मारून टाका. मी त्यांना अशा अवस्थेत घरी घेऊन जाऊ शकत नाही असं सागर म्हणतोय. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडालेला असताना चंद्रपूरातील या प्रकारानं सामान्य नागरिक किती हतबल झालाय ते दिसून येत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस