शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
3
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
4
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
5
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
6
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
7
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
8
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
9
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
10
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
11
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
12
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
13
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
14
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
15
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
16
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
17
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
18
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
19
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
20
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!

‘नीट’मुळे बदलतेय विद्यार्थ्यांचे प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 1:27 AM

वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राधान्य ‘नीट’मुळे (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) बदलत असल्याचे चित्र आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राधान्य ‘नीट’मुळे (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) बदलत असल्याचे चित्र आहे. मागील वर्षीपर्यंत गणित आणि जीवशास्त्र हे दोन्ही विषय घेऊन प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे वैद्यकीय प्रवेशासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. यावर्षी ५० हजार ६०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.राज्यात यंदा प्रथमच एमबीबीएस व बीडीएससह सर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ‘नीट’मधील गुणांचा आधार घेतला जाणार आहे. मागील वर्षी केवळ एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमांमध्ये नीटद्वारे प्रवेश दिले होते. यापूर्वी अभियांत्रिकी व वैद्यकीयसाठी एकच राज्य सीईटी घेतली जात होती. आता केवळ अभियांत्रिकी व औषधनिर्माण अभ्यासक्रमासाठी सीईटी असून वैद्यकीयसाठी विद्यार्थ्यांना ‘नीट’ परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. ‘नीट’ सीईटीच्या तुलनेत अधिक कठीण आहे. तसेच राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम आणि ‘नीट’च्या अभ्यासक्रमात फरक असल्याने ही परीक्षा कठीण जाते, असे विद्यार्थी व पालकांचे म्हणणे आहे.पूर्वी एकाच सीईटीमुळे अकरावीपासून गणित व जीवशास्त्र हे दोन्ही विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चांगली होती. हे विद्यार्थी अभियांत्रिकी व वैद्यकीयमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करीत असत. नीटमुळे विद्यार्थ्यांचा प्राधान्यक्रम बदलू लागला आहे. नीटची तयारी करताना गणित विषयाचा अतिरिक्त भार त्यांना नको आहे. प्रामुख्याने अभियांत्रिकीकडे जाणारे विद्यार्थी जास्त स्पर्धा नसल्याने एक किंवा दोन्ही विषयांचा पर्याय ठेवत असल्याचे चित्र पहायला मिळते.‘नीट’मुळे गणित व जीवशास्त्र हे दोन्ही विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे यावर्षी प्रवेशासाठी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण तुलनेने कमी दिसत आहे. यावर्षी सुमारे ५० हजार ६०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. - डॉ. प्रवीण शिनगारे,संचालक, वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय‘नीट’ मुळे स्पर्धा वाढली असून विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होत आहे. गणित व जीवशास्त्र विषय असल्यास त्यांच्या पुढील संधी वाढतात. मागील वर्षीचा कटआॅफ आणि नीटमध्ये मिळालेल्या गुणांचा विचार करूनच अनेक विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रवेशासाठी नोंदणीही केलेली नाही. हे प्रमाण पुढील वर्षी आणखी कमी होईल.- हरीश बुटले, प्रवेश परीक्षा तज्ज्ञ