शहरं
Join us  
Trending Stories
1
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
2
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
3
"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स
5
Gold Silver Price 1 October : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; विकत घेण्यापूर्वी पाहा आज सोनं स्वस्त झालं की महाग?
6
“रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत
7
घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?
8
ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS
9
"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?
10
काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला
11
PC Jewellers Share Price : वर्षभरात ६००% नी वाढला 'हा' Multibagger; आता १० भागांमध्ये स्प्लिट होणार, शेअरमध्ये तुफान तेजी
12
मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश
13
शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की' 
14
"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
15
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
16
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
17
'छोटा पॅकेट बडा धमाका', फक्त ९१ रुपयांत ९० दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा BSNLचा नवा प्लॅन
18
लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन
19
आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?
20
ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा

वातावरणातील बदल ठरताहेत घातक

By admin | Published: July 12, 2017 1:40 AM

वातावरणात अचानक होत असलेल्या बदलांमुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम जाणवत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनिगडी : वातावरणात अचानक होत असलेल्या बदलांमुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम जाणवत आहे. सध्या शहरात पहाटे गारवा, दुपारी कडक उन्हाचे तापमान व सायंकाळी खेळणारी थंड हवा़ त्यामुळे अनेक रुग्णालय, दवाखान्यांत रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.४३ डिग्री सेल्सिअसवर तापमान पोहोचले की ढगाळ वातावरण, गारपीटसदृश स्थिती निर्माण होऊन वातावरणात अचानक बदल घडत आहेत. त्यामुळे कधी प्रखर ऊन तर कधी गारवा असाच सध्याच्या वातावरणाचा अनुभव येत आहे. याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून उपनगर भागासह शहरातदेखील दवाखान्यांत रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे.झालेल्या बदलामुळे काय काळजी घ्यावी?पाणी स्वच्छ असण्याची काळजी घ्या, पाणी उकळून थंड करून प्यावे, हात वारंवार धुवा, डासांपासून बचाव करा, स्वच्छता पाळा, सर्दी व खोकल्याच्या रुग्णांनी रुमाल बांधावा. बाहेरून आल्यावर अचानक कूलर, एसीची हवा घेण्याचे टाळावे. बर्फ गोळा खाण्यापूर्वी त्याची शहानिशा करा. त्यावर टाकण्यात येणारे पदार्थयुक्त कलर कसे बनतात, त्यात साखरेचे प्रमाण किती असते, याची माहिती घ्या. पण शक्यतो असे पदार्थ खाण्याचे टाळणेच योग्य.उघड्यावरील खाद्य पदार्थ ठरताहेत धोकादायकजाधववाडी : जाधववाडी व कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर उघड्यावर खाद्यपदार्थ विकले जातात. या खाद्यपदार्थांवर आजूबाजूला घाणीचे साम्राज्य असल्याने मोठ्या प्रमाणात माशा उघड्या खाद्यपदार्थांवर बसतात. उघडे खाद्यपदार्थ हातगाडी व हॉटेलमध्ये विकले जातात. हे पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक व पोटाकरिता अपायकारक असून, नागरिक उघड्यावरील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना पाहायला मिळतात.वातावरणात बदल झाल्याने ताप आजारांचे रुग्ण वाढले आहेत. अकाली पावसामुळे तापमान कमी झाले. मात्र, पुन्हा कडाक्याचे ऊन तापायला सुरुवात झाल्याने शरीर संतुलन बिघडून आजाराला तोंड द्यावे लागत आहे. अशा पावसात भिजल्यास सर्दी, खोकला, ताप येऊ शकतो. तसेच उन्हात अधिक वेळ फिरल्यास शरीराला थकवा जाणवतो.-डॉॅ़ शैलजा भावसार, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी पिंं. चि. मनपाया दिवसामध्ये लहान मुलांना संसर्गजन्य आजार बळावतात. ताप व डायरिया सारखे आजार वाढतात. लहान मुलांना या दिवसांमध्ये सर्दी, ताप, डोकेदुखी, उलट्या, हगवण यासारखे आजार बळावतात. त्यामुळे डासांपासून बचाव करणे व दूषित पाण्यापासून सावध राहण्याची गरज आहे.- डॉॅ़ बबन ठोंंबरे, जनरल फिजिशिएशन.माशांपासून मुक्तता मिळण्याकरिता कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना विक्रेत्यांनी केलेल्या दिसत नाहीत. पावसाळ्यात शक्यतो उघड्यावरील खाद्यपदार्थ खाण्याचे टाळावे, घाणीवरील माशा उघड्या पदार्थांवर बसल्याने विषाणूंचा प्रवेश सहजरीत्या होतो, तसेच अतिप्रमाणात हे पदार्थ खाण्यात आल्यावर इन्फेक्शन होऊन जुलाब ,उलट्या होऊ शकतात परिणामी तापही येतो - डॉ. जयसिंग जाधव, जाधववाडी