शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

अधिकाऱ्यांवर १० वर्षांनी घोटाळ्याचे आरोपपत्र

By admin | Published: September 13, 2016 6:12 AM

रस्ते घोटाळ्याच्या प्रकरणात दोषींविरोधात वेगाने पावले उचलण्यात आली तरी अशा बऱ्याच घोटाळयांचे अहवाल येण्यास वर्षानुवर्षे लागत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

मुंबई : रस्ते घोटाळ्याच्या प्रकरणात दोषींविरोधात वेगाने पावले उचलण्यात आली तरी अशा बऱ्याच घोटाळ््यांचे अहवाल येण्यास वर्षानुवर्षे लागत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विभागस्तरावर करण्यात येणाऱ्या नागरी कामांमध्ये २००५ मध्ये झालेल्या घोटाळ्यांचा अहवाल तब्बल १० वर्षांनंतर उघड झाला आहे. या प्रकरणात १२ अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यापैकी निम्मे अधिकारी सेवेतून निवृत्त झाले असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुमोटो दाखल करून चौकशी सुरू केली आहे.विभागस्तरावर केल्या जाणाऱ्या छोट्या-छोट्या नागरी कामांमध्ये हा गैरव्यवहार २००५ ते २००९ या काळात झाला होता. ठेकेदारांची बिले अदा न केल्याप्रकरणी पालिकेच्या प्रचलन विभागातील १२ अभियंत्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली होती. २०१२ मध्ये या अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते, उपायुक्त (दक्षता) एम. एम. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी करण्यात आली होती. या चौकशीतून ए. आय. कोठारी, एस. पी. शहा आणि पी. एस. तिकोणे या तीन अभियत्यांना दोषमुक्त करण्यात आले. मात्र अन्य ९ अधिकाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. या दोषी अधिकाऱ्यांना सुनावलेल्या शिक्षेवर अमंलबजावणीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी आला आहे. मात्र कारवाईची शिफारस करण्यात आलेले नऊपैकी सहा अधिकारी हे यापूर्वीच सेवेतून निवृत्त झाले आहेत. वेतनवाढ रोखलीनरेश हमंद या अधिकाऱ्याची दोन वर्षांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. तर ए. हवाळ यांचे वेतन एक टप्प्याने कमी करण्यात आले आहे. भरत पाटील यांच्याकडून ४० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)के. एस. उत्तेकर, ए. पाठक, ए. ए. कुंटे, के. पी. देवरे हे चार अधिकारी पाच वर्षांपूर्वीच सेवेतून निवृत्त झाले असल्याने नियमांनुसार त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करता येत नाही. त्यामुळे हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपविण्यात आले आहे. तर वी. देसाई आणि एस. संभारे हे अधिकारी दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाले असल्याने त्यांच्या निवृत्ती वेतनातून दरमहा दोन हजार रुपये कापून घेतले जाणार आहेत.