शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अमोल कोल्हेंच्या विरोधात शिरुरमधून लढण्याची ऑफर होती का? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 11:27 IST

Chhagan Bhujbal on Amol Kolhe Shirur Lok Sabha Election 2024: मुख्यमंत्री शिंदेंनी भुजबळांना शिरुरमधून लढायचा पर्याय सुचवला होता, पण भुजबळांनी नकार दिला, असा दावा अमोल कोल्हे यांनी केला. त्यावर भुजबळांनी उत्तर दिले.

Chhagan Bhujbal on Amol Kolhe Shirur Lok Sabha Election 2024: सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. याच दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी एक दावा केला. शिरुर लोकसभेत माझ्या विरोधात छगन भुजबळ यांना (Chhagan Bhujbal) उमेदवारी दिली जाणार होती. मात्र, भुजबळांनी शिरुरमधून लढण्यास नकार दिला. त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आली, असा दावा कोल्हे यांनी केला. त्यांच्या या दाव्यावर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ म्हणाले, "माझ्या तोंडात चुकीचे शब्द घालू नका. मी कशाला तिकडे जाईन. मी त्यांना दोष देत नाही. भुजबळ हे नाव नाशिकमध्ये फायनल झालं होतं. मी सगळं सांगितले होते. दिल्लीत ठरलंही होतं. पण मुख्यमंत्री शिंदे यांना अडचण होती, त्यामुळे त्यांनी मला चांगुलपणा म्हणून मध्ये विचारलं की, शिरुरमध्ये ओबीसी आणि माळी समाज जास्त आहे, तुम्ही तिथून लढता का? त्यांचा हेतू हा होता की मी तिकडे गेलो तर नाशिकचा तिढा सुटेल. एक चांगला हेतू होता. ते प्रयत्न करणार होते. पण मी सांगितलं की ओबीसी समाज महाराष्ट्रभर आहे. माझा संबंध नाशिकशी आहे, मी पालकमंत्री आमदार नाशिकचा आहे. त्यामुळे मी काहीही मागितलं नाही."

"नाशिक सोडून मला पाहिजे म्हणून मी कुठेही उभा राहणार ही माझी वृत्ती नाही. त्यामुळे शिरूरला लढण्याचा प्रश्नच येत नाही. पार्टीने सांगितले म्हणून मी नाशिकला तयार झालो होतो. मला तशी अनेक ठिकाणी मागणी होती, सभा जिथे जिथे झाल्या तिथून मागणी होती. पण नाशिक ठरलं. नाशिक मिळालं तर ठीक नाहीतर काम सुरू आहे," असेही भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले.

महायुतीतील नाशिकचा तिढा कधी सुटणार हा प्रश्न आता तुम्ही निर्णय प्रक्रियेतील लोकांना विचारायला हवा. कारण हा तिढा कधीपर्यंत सुटणार हे मला माहित असते, तर मी उमेदवारी मागे घेतली नसती, असेही ते म्हणाले.

"नाशिकमध्ये भुजबळांना उमेदवारी मिळाली असती तर ते निवडून आले असते हे वडेट्टीवार म्हणत असतील तर मी त्यांचा आभारी आहे. एवढं खरं आहे मला उमेदवारी दिली असती तर मी निवडून आलो असतो. ब्राम्हण समाज आणि नाशिकचे उद्योजक आले होते. प्रत्येक जण येतो आणि सांगतोय की वातावरण चांगलं आहे. निवडून आलो असतो पण जर तर ला अर्थ नाही. वडेट्टीवारांनी दाखवलेल्या विश्वासाबाबत आभार. प्रत्येक पक्षाच्या अडचणी असतात. ते विरोधी पक्ष नेते आहेत. कधी प्रेम व्यक्त करत असतात, तर काही जण खरं प्रेम व्यक्त करतात आणि काही जण पुतना मावशीचे प्रेम व्यक्त करतात. पण मी वडेट्टीवारांचे आभार मानतो," असे भुजबळ यांनी सांगितले.

भुजबळ कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळणार अशी चर्चा आहे हे खरे आहे. कारण देविदास पिंगळे माझे कुटुंब आहे, रवींद्र पगार माझे कुटुंब आहे, असा उत्तर त्यांनी दिले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Chhagan Bhujbalछगन भुजबळDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेshirur-pcशिरूर