शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

महाराष्ट्राच्या भावनेशी खेळ करणाऱ्या CM एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा; संजय राऊत संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 10:38 IST

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आता विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मुंबई - हे बेईमान, गद्दार सरकार आहे त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला तो कोसळला. चांगल्या मनाने हे बनवलं नाही. राजकीय हेतूने बनवला. छत्रपती शिवाजी महाराजांनाही या लोकांनी सोडलं नाही. पुतळ्याच्या बांधकामातही लाखो-कोट्यवधीचा घोटाळा केला.  महाराष्ट्राच्या भावनेशी खेळ करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यायला हवा. जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, रवींद्र चव्हाण त्यांना बडतर्फ करायला हवं अशी मागणी करत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. 

पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम खाते आणि सरकारनं आपापल्या लोकांना टेंडर दिले. शिवाजी महाराजांना तरी सोडा. ज्यांचे शिवाजी महाराज लाडके होऊ शकले नाहीत ते लाडक्या बहिणींच्या गोष्टी करतात यावर महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही. महाविकास आघाडी या विषयाचा गांभीर्याने विचार करते. पुढे काय पाऊलं उचलायची आणि महाराष्ट्राच्या जनतेला कसं सामोरे जायचं. महाराष्ट्रात जो भ्रष्टाचार सुरू आहे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत या सर्व गोष्टी जनतेसमोर आम्ही सांगणार आहोत असं त्यांनी सांगितले. 

तसेच मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे म्हणून ते जमिनीवरून वर उडतायेत. नरेंद्र मोदी राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी घाईघाईने या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले. आम्ही केले, आम्ही केले ही श्रेयवादाची लढाई होती. तुम्ही इतकी घाई करू नका असं छत्रपती शिवाजीराजेंचं वंशज कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी सांगितले होते तरीही केले. सर्व कंत्राटदार मुख्यमंत्र्यांचे होते. महाराष्ट्रावर हा मोठा आघात आहे. महाराष्ट्राचं दैवत असलेल्या शिवरायांचा पुतळा त्यांच्याच किल्ल्यावर पडेल हे दुर्दैवी चित्र महाराष्ट्राने पाहिले. हवा महाराष्ट्रात जोराने वाहते, परंतु अनेक पुतळे किल्ल्यावर, समुद्राकिनारी आहेत. सत्तेची हवा डोक्यात गेली आहे असा घणाघात संजय राऊतांनी केला.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेल्या प्रतापगड किल्ल्यावर पंडित नेहरुंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केले. तो आजही मजबुतीने उभा आहे. मात्र ८ महिन्यापूर्वी सिंधुदुर्गात उभारलेला पुतळा ज्याप्रकारे उद्ध्वस्त झाला ती खूप मोठी वेदना आहे. त्या कामातही भ्रष्टाचार केला जातोय जिथं राष्ट्रभक्तीचं नाव घेतले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामातही भ्रष्टाचार केला. लाडकी बहिण बोलता पण आमच्या लाडक्या राजाला सांभाळू शकला नाही. महाविकास आघाडी हा विषय गंभीरतेने घेणार आहे असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Rautसंजय राऊतShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४