शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

शेतकरी आत्महत्येबाबत केंद्राला चुकीची माहिती दिल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची कबुली

By admin | Published: March 17, 2016 2:33 PM

शेतकरी आत्महत्येबाबत केंद्राला चुकीची माहिती दिली असल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे

ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १७ - शेतकरी आत्महत्येबाबत केंद्राला चुकीची माहिती दिली असल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. 
 
शेतक-यांच्या आत्महत्येवर कर्जमाफी हा उपाय नाही. कर्जमाफीने मतं मिळतील मात्र समस्या सुटणार नाहीत. कर्जमाफी हा रामबाण उपाय नाही, कर्जमाफीनंतरही शेतक-यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. त्यामुळे शेतक-यांच्या विकासावर भर देण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत.
 
शेतक-यांच्या कर्जाचं पुनर्गठन करणार आहोत. यावर्षी सिंचन विहीरींच टार्गेट पुर्ण होईल, वर्षभरात 33 हजार सिंचन विहीरी पुर्ण होतील अशी माहिती मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाराष्ट्राचा विकासदर देशापेक्षा जास्त आहे. शेतक-यांशिवाय मेक इन महाराष्ट्र होणार नाही. मेक इन महाराष्ट्रामध्ये शेतमालाचा विचार केला आहे. तसंच नवी मुंबई विमानतळ आणि अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ट्रस्ट तयार करण्याचं काम सुरु असून ट्रस्टचे प्रमुख उद्धव ठाकरे असतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. 
 
शिवाजी महाराजांचं स्मारक 40 महिन्यात पुर्ण करण्यात येणार आहे. तसंच ठाण्यात लवकरच मेट्रो सुरु करणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाचं काम आमच्या सरकारने केलं असून सरकारची भुमिका स्पष्ट आहे. न्यायालयात निकाल आपल्या बाजून लागेल असा विश्वास आहे. मराठा आरक्षणासाठी विरोधकांची भुमिका सकारात्मक आहे, तर मग त्यांनी राजकारण करु नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.