शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
2
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
3
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
4
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
5
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
6
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
7
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
8
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला
9
मुशीर खानचा भीषण अपघात! मुंबईच्या संघाला मोठा झटका; BCCI ने दिली महत्त्वाची माहिती
10
सलमानसोबत हिट सिनेमा, मात्र करिअरमध्ये अभिनेत्री ठरली अपयशी, १२ वर्षांपासून आहे कलाविश्वातून गायब
11
हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाह 'खतम'! मुलीचाही मृत्यू; इस्रायली लष्कराचा मोठा दावा
12
Investment Tips : गुंतवणूकदारांसाठी आली सुरक्षित गुंतवणुकीची संधी, सरकार उभारणार २० हजार कोटी, तुम्हालाही संधी मिळणार
13
IND vs BAN, 2nd Test Day 2 : एकही चेंडू नाही फेकला अन्.. ९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
14
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
15
Som Pradosh 2024: पितृपक्षात सोम प्रदोष व्रताची संधी म्हणजे दुप्पट लाभ; अवश्य करा 'ही' एक कृती!
16
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
17
फवाद खानच्या पाकिस्तानी सिनेमाला भारतात बंदीच! 'द लीजेंड ऑफ मौला जट' प्रदर्शित होणार नाही, कारण...
18
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
19
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
20
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती

माता भगिनींची झोप उडवून मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर; उद्धव ठाकरेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 3:17 PM

राज्यातील माता भगिनींची झोप उडवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात गेले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

ठळक मुद्दे. राज्यातील माता भगिनींची झोप उडवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात गेले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.गेल्या दोन आठवड्यांपासून संपावर असलेल्या राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे.

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २५ ते २९ सप्टेंबरपर्यंत परदेश दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या परदेश दौऱ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडाकडू टीका केली आहे. राज्यातील माता भगिनींची झोप उडवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात गेले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.  गेल्या दोन आठवड्यांपासून संपावर असलेल्या राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे. हजारो अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या झेंड्याखाली एकवटले आहेत. तेथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संबोधीत करत आहेत. तिथे बोलताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे.

सरकारमध्ये असतानाही रस्त्यावर उतरलो आहे. सत्तेचे कौतुक नाही. हा आक्रोश कुपोषित बालकांचा असून पेटलेले आंदोलन भडकवायला आलेलो नाही तर आंदोलनाला ताकद द्यायला आलो आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हंटलं आहे. तुमचा संप चिरडू देणार नाही. शिवसेना तुमच्या पाठिशी आहे. असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हंटलं.  ४ रुपये ९२ पैशांत पोषण आहार कसा देता? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. बाहेरील राज्यांमध्ये ऑक्सिजनच्या अभावी बालकांचा मृत्यू होतो. इथे देशाच्या आधारस्तंभाने दम तोडला. हा शाप सरकारने लावून घेतला आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी उत्तर प्रदेशाता ऑक्सिजनच्या अभावामुळे बालकांच्या झालेल्या मृत्यूवरून सरकारवर टीका केली आहे. 

अंगणवाडी कर्मचारी आणि आशा वर्कर या दोन्ही बहिणींमध्ये भांडण लावण्याचे काम सरकार करत आहे . तसे होऊ देऊ नका. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रतिष्ठेचा प्रश्न करू नका, अशी सरकारला विनंती करतो. लाडू द्यायचा की चिक्की हे मी सांगता. नाही. मात्र माता भगिनींच्या चुलीकडेही लक्ष द्या, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सौभाग्य योजनेवरही टीका केली आहे. वीज जोडून सौभाग्य जपता येणार नाही, त्यासाठी माणसं जपा, असंही म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे.