शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

मुख्यमंत्र्यांचा आदेश धुडकावला!

By admin | Published: April 19, 2016 4:21 AM

शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यास स्थगितीचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला खरा; परंतु या घोटाळ्याची चौकशी करीत असलेल्या

यदु जोशी,  मुंबईशिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यास स्थगितीचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला खरा; परंतु या घोटाळ्याची चौकशी करीत असलेल्या टास्क फोर्सचे अध्यक्ष आणि राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. के. वेंकटेशम् यांनी, घोटाळ्यातील संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दूरध्वनीवरून दिल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर ‘आता आम्ही नेमके काय करायचे?’ अशी लेखी विचारणा समाज कल्याण आयुक्त पीयूष सिंह यांनी या विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे. या टास्क फोर्सने आपली कार्यकक्षा सोडून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिल्याची बाब यानिमित्ताने समोर आली आहे. सामाजिक न्याय, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण या चार विभागांमधील शिष्यवृत्ती घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार डॉ. वेंकटेशम् यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली होती. जानेवारी २०१०पासून या चार विभागांमार्फत विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती व शैक्षणिक शुल्कवाटपात गैरव्यवहार झाला किंवा कसे याबाबत चौकशी करून राज्याच्या मुख्य सचिवांना अहवाल सादर करावा, चौकशीत सकृतदर्शनी दोषी आढळलेल्या व्यक्तींची नावे, पदनाम आणि कालावधी याबाबतची माहिती अहवालात नमूद करावी, अशा प्रकारचे गैरव्यवहार भविष्यात घडू नयेत म्हणून उपाययोजना सुचवाव्यात, चारही विभागांतील अधिकाऱ्यांना कधीही चौकशीसाठी बोलावता येईल, अशी या टास्क फोर्सची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली होती. या घोटाळ्याप्रकरणी संबंधित संस्थांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्याचे अधिकार टास्क फोर्सच्या कार्यकक्षेत नसताना विविध प्रकरणांत संबंधित संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश टास्क फोर्सने समाज कल्याण आयुक्तालयास (पुणे) दिले. त्यानुसार आतापर्यंत बुलडाणा, चंद्रपूर, बीड आणि वर्धा या जिल्ह्यांमधील संबंधित संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश संबंधित सहायक आयुक्त; समाज कल्याण यांना वेळोवेळी देण्यात आले आहेत.मुख्यमंत्री काय म्हणाले?पीयूष सिंह यांच्या पत्रात आणखी एक धक्कादायक माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ५ एप्रिल २०१६ रोजी मुंबईत क्रिमिलेअरची मर्यादा वाढविण्याबाबत बैठक झाली होती. त्या वेळी टास्क फोर्सने गुन्हे दाखल करण्याबाबत दिलेल्या निर्देशास मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीत स्थगिती दिली. सामाजिक न्याय विभागातील काही अधिकाऱ्यांनी ४ एप्रिलला आपली भेट घेऊन टास्क फोर्स करीत असलेल्या कार्यवाहीबाबत आपल्याशी चर्चा केली. गुन्हे दाखल करण्यास स्थगिती देण्यात येत असून, टास्क फोर्सने अनियमिततांबाबतचा अहवाल शासनास सादर करावा, असे मुख्यमंत्री त्या बैठकीत म्हणाले.