शहरं
Join us  
Trending Stories
1
मासिक पाळीत नोकरदार महिलांना सुट्टी? सर्वोच्च न्यायालयाला वाटतेय मोठी भीती, आम्ही आदेश दिला तर...
2
Eknath Shinde: मी राज्याचा मुख्यमंत्री असेपर्यंत...; एकनाथ शिंदेंचा राज्यातील जनतेला मोठा शब्द
3
वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर; कर्णधार टेम्बा बवुमाची एन्ट्री
4
Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला, मुलांच्या रुग्णालयासह ५ मोठ्या शहरांना लक्ष्य, २० लोकांचा मृत्यू
5
Home Loan : बजेटनंतर स्वस्त होणार होमलोन? वाचा सविस्तर
6
“शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेचा अहंकार”; वरळी हिट अँड रन प्रकरणावरुन नाना पटोलेंची टीका
7
नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक अनिल परबांनी लक्षात आणून दिली; म्हणाल्या, "मी अनावधानाने..."
8
“पहिल्याच पावसात सरकारचे पितळ उघडे पडले, अपयशाचे खापर पावसावर फोडू नये”; नाना पटोलेंची टीका
9
SL vs IND : भारताविरूद्धच्या मालिकेपूर्वी श्रीलंकेची रणनीती; Sanath Jayasuriya वर सोपवली मोठी जबाबदारी
10
मुंबईसह राज्यात अतिवृष्टी, पावसाची स्थिती काय? देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती
11
विशाल पांडेची बहीणही भडकली, शेअर केली लांबलचक पोस्ट; अरमान मलिकला बाहेर काढण्याची मागणी
12
अंबानींच्या 'अँटिलिया' मधील सोहळ्याला हजेरी लावलेली 'ती' सौंदर्यवती नक्की आहे तरी कोण?
13
गेल्या ४४ वर्षांपासून करण जोहर 'या' गंभीर आजाराचा करतोय सामना, स्वत:च केला खुलासा
14
Astro Tips: आषाढ गुप्त नवरात्रीत अविवाहित मुला-मुलींनी करा 'हे' उपाय; वैवाहिक अडचणी होतील दूर!
15
Sharad Pawar : 'सरकारने दिलेल्या सवलतींचा गैरवापर करू नका'; शरद पवारांचे शेतकऱ्यांना आवाहन
16
Mumbai Rains Live Updates: कामावरुन घरी परतणाऱ्यांना दिलासा, मध्य आणि हार्बर रेल्वेसेवा पूर्ववत
17
रांगेत या, 'घेऊन'च जा! बिअर वाटपाचा जाहीर कार्यक्रम, भाजपा खासदाराचं 'झिंगाट' सेलीब्रेशन
18
टीम इंडियाचा प्रत्येक खेळाडू मालामाल होणार; १२५ कोटींच्या बक्षिसातील कोणाच्या वाट्याला किती येणार? आकडे समोर
19
कारवाला येतोय, उडवून जातोय! हेल्मेट घाला, नाहीतर चिलखत, महाराष्ट्रात दुचाकी चालविणे म्हणजे...
20
अंगावर काटा आणणारी घटना; लोकल पकडताना महिला पाय घसरून रुळावर पडली अन्...

मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर प्रकाश आंबेडकरांची वसंत मोरेंवर टीका; म्हणाले तीन विषयांवर चर्चा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 5:10 PM

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आंबेडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच शिंदेंसोबत झालेल्या चर्चेचा तपशीलही त्यांनी दिला.

मनसे सोडत लोकसभेला वंचितमध्ये उमेदवारीसाठी आलेल्या पुण्याचे वसंत मोरे यांनी शिवबंधन बांधणार असल्याचे जाहीर केले आहे. मातोश्रीवर जाऊन ते येत्या काही दिवसांत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावेळी मोरे यांनी वंचितच्या लोकांनी, मतदारांनी आपल्याला स्वीकारले नसल्याचे कारण सांगितले होते. आता त्याला प्रकाश आंबेडकर यांचे प्रत्यूत्तर आले आहे. 

वसंत मोरेंचे राजकारण आयाराम-गयारामांप्रमाणे आहे. त्यांना माणसे ओळखता येत नाहीत. त्यांच्याकडून सातत्याने अशा गोष्टी घडत आहेत, अशी टीका आंबेडकर यांनी केली. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आंबेडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच शिंदेंसोबत झालेल्या चर्चेचा तपशीलही त्यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेमध्ये मुख्य तीन मुद्दे होते, जमीनीवरील शेतीसाठी केले अतिक्रमण, गावामध्ये स्वतंत्र घरे बांधली आहेत त्याला अतिक्रमण काढण्याच्या नोटीसा आल्या आहेत. तसेच दीक्षाभूमी आंदोलन प्रकरण या मुद्द्यांवर चर्चा झाली. ज्यांनी शेतीसाठी अतिक्रमण केले आहे त्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही, ती पिकं त्यांनाच मिळतील असा निर्णय त्याठिकाणी घेण्यात आला असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. 

गावामधील घरे आहेत पण ती अतिक्रमीत आहेत असे दाखवण्यात आले आहे. त्यांना उठवले जाणार नाही. नोटीस बजावल्या जाणार नाहीत. त्यासंदर्भातील नवीन धोरण शासन लवकरच जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. याचबरोबर दीक्षाभूमी प्रकरणात ज्या कार्यकर्त्यांवर केसेस झाल्या आहेत त्या सर्व केसेसवर कोणतीही पुढची प्रक्रिया होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत, असेही आंबेडकर म्हणाले. 

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVasant Moreवसंत मोरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे