शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

गडचिरोलीत बालमृत्यू वाढले

By admin | Published: December 01, 2015 3:28 AM

बालमृत्यू रोखण्यासाठी शासन नवनवीन कार्यक्रम आखून त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे. तरीही गेल्या चार वर्षांत बालमृत्यू रोखण्यात शासनाला म्हणावे तितके यश आलेले नाही.

- सुमेध वाघमारे,  नागपूरबालमृत्यू रोखण्यासाठी शासन नवनवीन कार्यक्रम आखून त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे. तरीही गेल्या चार वर्षांत बालमृत्यू रोखण्यात शासनाला म्हणावे तितके यश आलेले नाही. आरोग्य सेवा, नागपूर मंडळांतर्गत येणाऱ्या सहा जिल्'ात एक ते पाच वर्षे वयोगटातील बालमृत्यूमध्ये केवळ १३.२८ टक्के घट झाली आहे. मात्र, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्'ात शून्य ते एक वर्षांतील बालमृत्यूंमध्ये वाढ झाल्याचे धक्कादायक चित्र आहे.शासनाने बालमृत्यू कमी करण्यासाठी नवसंजीवनी योजना, जननी सुरक्षा योजना, जेएसएसके योजना, १०८ अ‍ॅम्ब्युलन्सची सेवा, मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत लसीकरणाची सेवा, ग्रामीण स्वास्थ मिशन, एनएचएम अंतर्गत मोबाइल मेडिकल युनिट सेवा व मानवविकास कार्यक्रम कार्यान्वित आहेत. यात गर्भवती मातांना अनुदान, त्यांची तपासणी, स्तनदा मातांची तपासणी व शून्य ते सहा महिने बालकांची मोफत तपासणी, औषध व प्रवासही दिला जातो. यावर वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत, असे असतानाही अपेक्षित यश मिळत नसल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.२०६६ बालमृत्यूू- आरोग्य सेवा मंडळ, नागपूर अंतर्गत नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा हे सहा जिल्हे येतात. शून्य ते एक वर्ष वयोगटात २०११-१२मध्ये भंडाऱ्यात ३८१, गोंदियात ४३६, चंद्रपूरात ७०२, गडचिरोलीत ४२६, वर्धेत ३८२ तर नागपूर जिल्'ात २४० असे मिळून २५६७ बालकांचा मृत्यू झाला. याच्या तुलनेत २०१४-१५मध्ये भंडाऱ्यात ४३४, गोंदियात ४८५, चंद्रपूरमध्ये १५०, गडचिरोलीत ५९८, वर्धेत २२५ तर नागपूर जिल्'ात १७४ असे मिळून २०६६ बाल मृत्यू झाले आहेत. यात चंद्रपूर, वर्धा व नागपुरात बालमृत्यूदर कमी झाला असला तरी गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्'ात तो वाढला आहे.जिल्हानिहाय बालमृत्यूजिल्ह्याचे नाव२०११-१२२०१२-१३२०१३-१४२०१४-१५भंडारा३८१५१८४५३४३४गोंदिया४३६४२२५१७४८५चंद्रपूर ७०२६०९४५११५०गडचिरोली४२६५८७५१२५९८वर्धा३८२३५५२६३२२५नागपूर २४०१६११२९१७४