शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

नागरिकांच्या बजेटला कट

By admin | Published: April 04, 2017 1:04 AM

शहरातील नागरिकांनी सुचविलेल्या कामांसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात खास निधीची तरतूद करण्यात येते.

पुणे : शहरातील नागरिकांनी सुचविलेल्या कामांसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात खास निधीची तरतूद करण्यात येते. परंतु यंदा नागरिकांच्या बजेटला आयुक्तांनी मोठा कट लावला आहे. सन २०१७-१८ अंदाजपत्रकात यासाठी केवळ आठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे प्रशासनाकडून नागरिकांच्या सहभागाला खो घातला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.शहराच्या विकासामध्ये नागरिकांच्या थेट सहभागासाठी गेल्या दहा वर्षांपासून नागरिकांचे बजेट हा खास उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांनी आपल्या परिसरातील विविध लहान-मोठी कामे सुचविल्यावर महापालिकेच्या वतीने यासाठी दर वर्षी निधीची तरतूद करून ही कामे केली जातात. यासाठी नागरिकांकडून कामांची यादी मागविली जाते, त्यावर या कामांची निवड करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आलेली असते. ही समिती कामे अंतिम करून त्यावर खर्च टाकला जातो. गेल्या काही वर्षांत या उपक्रमाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत होता. परंतु महापालिकेच्या कामातील नागरिकांचा वाढता प्रतिसाद कमी करण्यासाठी प्रशासनाकडून पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू आहे. यासाठी गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांचे बजेट यासाठी अत्यंत अल्प तरतूद करण्यात येत आहे.प्रामुख्याने शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांचा गेल्या काही वर्षांत ‘नागरिकांचे बजेट’ अंतर्गत मोठा सहभाग होता. परंतु यंदा याच मध्यवर्ती भागातील क्षेत्रीय कार्यालयामध्ये नागरिकांच्या बजेटसाठी कोणत्याही स्वरूपाची तरतूद करण्यात आलेली नाही. यामध्ये औंध, घोले रोड, ढोले पाटील, नगर रोड, टिळक रोड, भवानी पेठ, सहकारनगर आणि कसबा पेठे, विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयात नागरिकांचे बजेटमध्ये या क्षेत्रीय कार्यालयांतील नागरिकांच्या कामांसाठी निधीची तरतूद नाही. सन २०१७-१८ या वर्षाच्या अंदाजपत्रकात आयुक्त कुणाल कुमार यांनी नागरिकांच्या कामांसाठी केवळ ८ कोटी ४ लाखांची तरतूद केली आहे. त्यामध्ये १४ क्षेत्रीय कार्यालयांतील केवळ ८ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील कामांसाठीच ही तरतूद आहे. गतवर्षीच्या (२०१६-१७) आयुक्तांच्या अंदाजपत्रकात १० कोटी ३९ लाखांची तरतूद होती. तर २०१४-१५ च्या अंदाजपत्रकात तब्बल ३८ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद होती. त्यात ७६ प्रभागांमधील रस्ते, ड्रेनेज, विद्युत अशा विविध कामांचा समावेश होता.