शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

शहरात घोडागाडीवर बंदी कायम

By admin | Published: April 04, 2017 6:04 AM

शहरांतील रस्त्यावरून घोडागाडी चालवण्यास घातलेली बंदी मागे घेण्यात यावी

मुंबई : शहरांतील रस्त्यावरून घोडागाडी चालवण्यास घातलेली बंदी मागे घेण्यात यावी, यासाठी काही घोडागाडी मालक व चालकांनी केलेली फेरविचार याचिका सोमवारी उच्च न्यायालयाने निकाली काढली. घोडागाडी मालक-चालकांच्या पुनर्वसनाबाबत राज्य सरकारने धोरण आखले असून, हे धोरण कॅबिनेटच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. जून २०१५ मध्ये उच्च न्यायालयाने मुंबईत घोडागाडी चालवणे बेकायदा असल्याचे म्हणत, सर्व घोडागाडी व विनापरवाना तबेले बंद करण्याचा आदेश पालिकेला दिला, तसेच सरकारला घोडागाडी चालकांचे व मालकांचे पुनर्वसन करण्यासाठी सहा महिन्यांत धोरण आखण्याचा आदेश दिला. दीड वर्ष उलटूनही राज्य सरकारने घोडागाडी मालक-चालकांच्या पुनर्वसनाबाबत अंतिम धोरण तयार केलेले नाही. या निर्णयाविरुद्ध घोडागाडी मालक-चालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अन्य कायदेशीर पर्याय निवडण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, सुमारे ५० घोडागाडी मालक-चालकांनी उच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली.घोडागाडी मालक-चालकांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात धोरण तयार असून, ते मंजुरीसाठी कॅबिनेटपुढे मांडण्यात येईल, असे सरकारी वकिलांनी स्पष्ट केले. त्यावर धोरण आखण्यास विलंब झाल्याची आठवण खंडपीठाने राज्य सरकारला करून देत, घोडागाडी चालकांची याचिका निकाली काढली. (प्रतिनिधी) >न्यायालयाने नाकारली चालकांची विनंतीघोडागाडी मालक-चालकांनी आगामी दोन महिने सुट्टीचे असल्याने, या काळात घोडागाडी चालवण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती खंडपीठाला केली होती. मात्र, खंडपीठाने ती ही विनंती मान्य करण्यास नकार दिला असून शहरातील घोडागाडी बंदी कायम राहणार आहे.