शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

'संविधानाशी एकनिष्ठ राहा', लोकसभा निवडणुकीपूर्वी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 19:23 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली.

CJI DY Chandrachud: लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तत्पूर्वी भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) यांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. वकील आणि न्यायाधीशांनी संविधानाशी एकनिष्ठ असले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. तसेच, न्यायाधीशांनी पक्षपाती नसावे असेही ते म्हणाले. नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनच्या शताब्दी सोहळ्यात न्यायमूर्ती चंद्रचूड बोलत होते.

यावेळी ते म्हणतात, भारतासारख्या चैतन्यशील आणि तर्कशुद्ध लोकशाहीमध्ये बहुतांश लोकांचा कल कोणत्या ना कोणत्या राजकीय विचारसरणीकडे असतो. ॲरिस्टॉटल म्हणाले होते की, मानव हा राजकीय प्राणी आहे आणि वकील याला अपवाद नाहीत. बारच्या सदस्यांनी न्यायालय आणि संविधानाबाबत पक्षपाती असू  नये."

बार कौन्सिलच्या सदस्यांना सरन्यायाधीशांचा सल्लादेशाच्या सरन्यायाधीशांनी भारताच्या न्यायव्यवस्थेवरही महत्त्वाचे भाष्य केले. ते म्हणाले की, न्यायपालिका आपल्या स्वातंत्र्यासाठी, कार्यकारिणी, कायदेमंडळ आणि निहित राजकीय हितसंबंधांपासून अधिकार वेगळे करण्यासाठी वेळोवेळी पुढे येत आहे. आपण हे विसरता कामा नये की, न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि बारचे स्वातंत्र्य यांचा खोलवर संबंध आहे. एक संस्था म्हणून बारचे स्वातंत्र्य कायद्याचे राज्य आणि घटनात्मक शासनाचे रक्षण करण्यासाठी नैतिक ढाल म्हणून कार्य करते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शंका घेणाऱ्यांना सल्लाCJI म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक खंडपीठांचे निर्णय कठोर कृती, खोल कायदेशीर विश्लेषण आणि घटनात्मक तत्त्वांना वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करतात. निवाडा सुनावल्यानंतर ती सार्वजनिक मालमत्ता बनते. एक संस्था म्हणून आम्ही प्रशंसा आणि टीका दोन्ही स्वीकारतो. ही प्रशंसा आणि टीका पत्रकारितेतून असो, राजकीय असो वा सोशल मीडिया असो. आम्ही काही बोललो, तर त्याचा मोठा प्रभाव पडतो. बार असोसिएशनचे सदस्य, अधिकारी आणि वकिलांनी न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सर्वसामान्यांच्या विरोधात भाष्य करू नये, असेही सरन्यायाधीश म्हणाले. 

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडSupreme Courtसर्वोच्च न्यायालयnagpurनागपूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४