शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

स्वच्छतेची मोहीम घरापासून करा

By admin | Published: February 05, 2017 11:48 PM

भाजपाचे पदाधिकारी आणि निवडणुकीतील उमेदवारांनी पारदर्शकतेची शपथ घेतली असली, तरी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी २ लाखांची मागणी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे़

सोलापूर : भाजपाचे पदाधिकारी आणि निवडणुकीतील उमेदवारांनी पारदर्शकतेची शपथ घेतली असली, तरी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी २ लाखांची मागणी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे़ त्यामुळे आधी घरापासून सुरुवात करा, मग सार्वजनिक जीवनात स्वच्छ राहण्याची भाषा शोभून दिसेल, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी भाजपाला लगावला.सोलापूर दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना खा़ चव्हाण यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवर चौफेर टीका केली़ मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विकासावर होणारे परिणाम, नोटाबंदीने जनतेची झालेली हालअपेष्ठा, अर्थव्यवस्थेवरील परिणाम आदी विषयांवर प्रकाश टाकला़ भाजपा-सेनेच्या भांडणाकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, राज्यात एकत्र काम करतात, यापूर्वी कोणत्याच सेनेच्या मंत्र्यांनी विरोध दर्शविला नाही़ आता नेमके निवडणुकीत भाजपाकडून औकात दाखवण्याची भाषा केली जाते आणि सेना निमूटपणे ऐकून घेते, हा सारा प्रकार जनतेची फसवणूक करण्यासाठी आहे़ सरकारच्या अपयशाचे खापर निवडणुकीत आपल्यावर फुटू नये यासाठी जनतेचे लक्ष वेधण्यासाठी आखलेली नियोजनबद्ध खेळी आहे़ यामुळे काँग्रेसला राजकारणात ‘स्पेस’ मिळू नये, झाला फायदा तर भाजपाचा अथवा सेनेचा व्हावा ही त्यामागची रणनीती आहे़ निवडणुकीनंतर ते पुन्हा एकत्रच येणार आहेत़ खा़ किरीट सोमय्या आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तसे सूतोवाच केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले़