शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
3
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
4
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
5
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
6
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
7
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
8
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
9
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
10
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
11
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
12
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
13
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
15
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
16
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
17
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
18
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
19
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
20
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर

किरणोत्सवाला ढगांचा अडथळा

By admin | Published: February 02, 2016 4:06 AM

करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा दुसऱ्या दिवशीचा किरणोत्सव सोमवारी सायंकाळी झालेल्या ढगाळ वातावरणामुळे होऊ न शकल्याने भाविकांची निराशा झाली.

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा दुसऱ्या दिवशीचा किरणोत्सव सोमवारी सायंकाळी झालेल्या ढगाळ वातावरणामुळे होऊ न शकल्याने भाविकांची निराशा झाली. पहिल्या दिवशी (रविवारी) सूर्यकिरणांनी देवीच्या चरणांना स्पर्श केला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी हीच सूर्यकिरणे देवीच्या खांद्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने भाविकांनी हा सोहळा पाहण्यासाठी अलोट गर्दी केली होती, पण सूर्यकिरणे साडेपाच वाजेपर्यंत मंदिराच्या पश्चिमद्वार महाद्वाराला स्पर्श करून गायब झाली. मंगळवारी किरणोत्सवाचा अखेरचा दिवस आहे. सोमवारी किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भाविकांनी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामध्ये बाहेरगावांहून आलेल्या भाविकांची संख्या मोठी होती. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये या किरणोत्सवात महाद्वार रोड ते रंकाळा टॉवर या रस्त्यावरील इमारती, मोबाइल टॉवर, जाहिराती फलक यांचा अडथळा येत होता. हे किरणोत्सवातील अडथळे दूर करण्याबाबत कोल्हापूर महापालिकेला कळविले होते. त्यामुळे यातील काही अडथळे हटवण्यात आले होते. त्यामुळे रविवारी पहिल्या दिवशी सूर्यकिरणांनी मंदिरात प्रवेश करत थेट अंबाबाई देवीच्या मूर्तीला चरणस्पर्श केला. किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दुपारनंतर ढगाळ वातावरण राहिले. तरीही साडेपाच वाजता मंदिराच्या पश्चिमद्वारापर्यंत सूर्यकिरणे पोहोचली. त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे किरणातील घनताचे प्रमाण कमी असल्याने किरणोत्सव झाला नाही.ही सूर्यकिरणे सायंकाळी ६.१० वाजता देवीच्या खांद्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता होती, अशी माहिती प्रा. डॉ. एम.एम. कारंजकर यांनी दिली. या वेळी केआयटी कॉलेजचे प्रा. किशोर हिरासकर, चंद्रकांत परुळेकर यांच्यासह केआयटीचे विद्यार्थी, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे, व्यवस्थापक धनाजी जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)