शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

CM फडणवीसांनी केले मनोज जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत; म्हणाले, “निश्चित मागण्या मान्य...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 20:43 IST

CM Devendra Fadnavis First Reaction On Manoj Jarange Patil Decision: मागण्यांची लवकर अंमलबजावणी न झाल्यास मुंबईच्या आंदोलनाची तारीख जाहीर करेन. तेव्हा मुंबई ठप्प होऊ शकते, मुंबईत आंदोलन सुरू केले तर तिथून काही मराठे माघार घेणार नाहीत, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

CM Devendra Fadnavis First Reaction On Manoj Jarange Patil Decision: पावणे दोन वर्ष मी सहन केले. मी फडणवीसांना उत्तर मागितले होते, पण त्यांनी काही दिले नाही. ८ मागण्या केल्या त्या पूर्ण करणार की नाही? मराठ्यांच्या मागणीची अंमलबजावणी केली नाही तर मी सरकारला सुखी राहू देणार नाही. मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही तर मुंबईला येण्याची तारीख घोषित करेन. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपण सामूहिक उपोषण केले. इतके दिवस बसावे लागेल वाटले नाही, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी सुरू असलेले उपोषण स्थगित केले. उपोषण मागे घेत असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. 

बीड प्रकरण लावून धरणाऱ्या सुरेश धस यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि सरकारकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची यादी वाचून दाखवली. देवेंद्र फडणवीस मराठ्यांशी १०० टक्के गद्दारी करणार नाही. ते आमच्या मागण्या मान्य करतील जर नाही केले तर लवकरच आम्ही मुंबईला येण्याची तारीख जाहीर करू. यावेळी मुंबई जाम होऊ शकते, मराठे माघारी येऊ शकत नाही. आमच्या लेकराला नख लागू देऊ नका. जर पोरं बिथरले तर आमदार, खासदारांना हाणतील, मराठ्यांनी एकदा निर्णय घेतला तर माघारी घेणार नाही, असा इशारा देताना आंदोलनाची पुढील दिशा काय असू शकेल, याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी सूतोवाच केले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले मनोज जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथे प्रचारसभा, बैठका घेत आहेत. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याच्या निर्णयाबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. यावर बोलताना, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले याचा आनंद आहे. आम्ही मराठा समाजाच्या संदर्भात जे काही निर्णय घेतले आहेत, ते महायुतीच्या सरकारनेच घेतले आहेत. हे सगळे निर्माण झालेले प्रश्न कायद्याच्या चौकटीत सोडवणे ही आमची जबाबदारी आहे, आम्ही तो प्रयत्न करत आहोत. कायद्याच्या चौकटीतील ज्या मागण्या ते करतील किंवा कोणीही करेल, त्या मागण्या आम्ही निश्चित मान्य करू. पण आमचे म्हणणे एवढेच आहे की, भारताचे संविधान आणि कायदा यांच्या चौकटीतील मागण्या असल्या पाहिजेत. त्या असल्या तर योग्य प्रतिसाद सरकारकडून मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून लढा देत असलेले नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. भाजपा आमदार सुरेश धस यांनी त्यांना ज्यूस देऊन हे उपोषण सोडवले. तसेच मुंबई उच्च न्यायालयात सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणी नव्याने घेतली जाणार असल्याने आता मराठा आंदोलनाची पुढील दिशा नेमकी कशी असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण