शहरं
Join us  
Trending Stories
1
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
4
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
5
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
6
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
7
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
8
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
9
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
10
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
11
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
12
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
13
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
14
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
15
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
16
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
17
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
18
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
19
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
20
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी

Maharashtra Political Crisis: “बंडाची लढाई छोटी नव्हती, थोडा जरी दगाफटका झाला असता तर शहीद झालो असतो”: एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 1:34 PM

Maharashtra Political Crisis: सरकार, सत्ता आणि यंत्रणा होती. कोण कुठे जातोय यावर वॉच होता. लढाई अवघड असली तरी आम्ही ती जिंकलो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.

Maharashtra Political Crisis:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बैठकांचा सपाटा लावल्याचे दिसत असून, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. निष्ठा आणि शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून  राज्यभर दौरे सुरू केले आहेत. दुसरीकडे शिंदे गटाला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठे विधान केले आहे. बंडाची लढाई अजिबात छोटी नव्हती. थोडा जरी दगाफटका झाला असता तर शहीद झालो असतो, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. 

आम्ही बंड केले. ती लढाई काही छोटी नव्हती. लढाई खूप मोठी होती. तशी कठीणही होती. एकीकडे सरकार, सत्ता आणि यंत्रणा होती. कोण कुठे जातोय यावर वॉच ठेवला जात होता. तर दुसरीकडे सर्वसामान्य कार्यकर्ते होते. आम्हाला दगाफटका होईल असे वाटत होते. दगा फटक्याचा धोका होता. अशावेळी थोडे जरी इकडे तिकडे झाले असते, दगाफटका झाला असता तर शहीदच झालो असतो, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. आम्ही बंड केल्यानंतर काय होईल, काय होईल, असे सर्वांना वाटत होते. त्यामुळे सर्वांच्या नजरा आमच्याकडे लागल्या होत्या. पण लढाई अवघड असली तरी आम्ही त्यात यशस्वी झालो, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

देवीच्या आशीर्वादाने सगळे काही सुरळीत झाले

पद्मावती मंदिरात एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी एक छोटेखानी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना, बंड करताना थोडा जरी दगा फटका झाला असता तरी शहीद होण्याचा धोका होता, असे सांगतानाच लोकांचा आणि देवीच्या आशीर्वादाने सगळे काही सुरळीत झाले, असे शिंदे म्हणाले. तसेच मी माझी मूळे विसरलो नाही. त्यामुळे माझ्या मूळ गावी आलो आहे. जनतेचा मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहून मला गहिवरून आले आहे. माझ्या गावी आलोय. साताऱ्याचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहे. हे टुरिस्ट स्पॉट व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. 

दरम्यान, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच सातारा येथील दरे या आपल्या गावी सहकुटुंब आले होते. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे प्रचंड जल्लोषात स्वागत केलं. यावेळी त्यांनी आपल्या कुलदैवतेचं दर्शन घेतले. त्यानंतर ते तापोळा येथे आले होते.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेSatara areaसातारा परिसर