शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
3
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
5
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
6
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
7
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
8
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
9
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
10
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
11
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
12
Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम
13
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
14
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट
15
माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी
16
१० मिनिटांत घरी पोहोचणार गरमागरम जेवण, Swiggy नं सुरू केली नवी सेवा; मुंबई-पुण्यासह 'या' ठिकाणी घेता येणार लाभ
17
Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?
18
Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ
19
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
20
Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?

...तेव्हा बाळासाहेबांना दु:ख झाले असेल: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 12:35 PM

निवडणूक आयोगाकडे दोन्ही गट त्यांची भूमिका मांडेल. विधानसभेत दोन तृतीयांश बहुमत आमच्याकडे आहे. शिवसेना आम्हीच आहोत. लोकसभेतही दोन तृतीयांश खासदार आमच्यासोबत आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई - २०१९ ची निवडणूक महायुती म्हणून आम्ही लढवली. बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बॅनरवर फोटो होतो. जनतेनेही या युतीला कौल दिला. त्यानंतर दुर्दैवाने भाजपाला सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. तेव्हा खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना दु:ख झाले असेल. ज्यांना बाळासाहेबांनी आयुष्यभर जवळ केले नाही त्यांच्यासोबत शिवसेना गेली असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही जी भूमिका घेतली ती बाळासाहेबांना आवडणारी आणि त्यांच्या विचारांची भूमिका घेतली. युतीचं सरकार यापूर्वी गठीत झाले होते त्याचे शिल्पकार बाळासाहेब होते. महायुती म्हणून निवडणूक लढवली आणि जनमताने कौल दिल्यानंतर २०१९ मध्ये दुर्दैवाने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ केले नाही. मात्र महाविकास आघाडी जेव्हा बनवली तेव्हाच बाळासाहेबांना दु:खं झाले असेल. आमदारांचे खच्चीकरण होत होते, शिवसैनिकांवर अन्याय होत होता म्हणून शिवसैनिकांवर अन्याय दूर करण्यासाठी आम्ही हा लढा उभा केला. बाळासाहेबांना खरा आनंद वाटत असेल शिवसेना वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि आमदारांनी पुढाकार घेतला असं त्यांनी सांगितले. 

तसेच निवडणूक आयोगाकडे दोन्ही गट त्यांची भूमिका मांडेल. विधानसभेत दोन तृतीयांश बहुमत आमच्याकडे आहे. शिवसेना आम्हीच आहोत. लोकसभेतही दोन तृतीयांश खासदार आमच्यासोबत आहेत. शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता आहे. ही शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आहे. विधिमंडळात आम्हाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगासमोर आम्ही आमची भूमिका मांडू असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 

मंत्रिमंडळ विस्तार लवकरचजी कामे मागच्या मंत्रिमंडळाने घाईगडबडीने निर्णय घेतले, जीआर काढले त्याला स्थगिती दिली आहे. विकासकामांना स्थगिती देणार नाही. ज्याप्रकारे निर्णय घेतले त्याला स्थगिती दिली आहे. काल आम्ही दिल्लीला गेलो होतो, पंतप्रधानांनी ठेवलेल्या स्नेह भोजनला आम्ही उपस्थित होतो. सर्वच वरिष्ठ नेत्यांची भेट झाली. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल असं शिंदेंनी सांगितले. 

मला सुरक्षा देण्याची शिफारस गृहमंत्रालयाची होती मी गडचिरोलीत पालकमंत्री म्हणून काम करत होतो, पोलिसांनी नक्षलांविरोधात मोहिम आखली होती. अनेक विकासकामे उभी केली. त्याला नक्षलांनी विरोध केला. परंतु पोलिसांनी त्यांना न जुमानता नक्षलविरोधी मोहिम तीव्र केली. त्यात २७ नक्षलींचा खात्मा केला. तेव्हा मला मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. गृहविभागाने झेड प्लस सुरक्षा देण्याची शिफारस केली होती. त्याबाबत शंभुराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिले आहे अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेना