शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

‘दुष्काळावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक बोलवावी’

By admin | Published: April 19, 2016 4:12 AM

दुष्काळाच्या प्रश्नावर विरोधी पक्षाने कधीही राजकारण केले नाही. उलटपक्षी उपाययोजनांबाबत सरकारला नेहमीच विधायक सूचना केल्या

शिर्डी : दुष्काळाच्या प्रश्नावर विरोधी पक्षाने कधीही राजकारण केले नाही. उलटपक्षी उपाययोजनांबाबत सरकारला नेहमीच विधायक सूचना केल्या. राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षांचे सहकार्य हवे असल्यास त्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली आहे.दुष्काळी स्थितीबाबत मुख्यमंत्र्यांच्या विधानावर विखे म्हणाले, दुष्काळाबाबत संवेदना नसलेले हे ‘सेल्फी’ सरकार आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांतून नागरिकांचे स्थलांतर सुरू होते, तेव्हा या सरकारच्या संवेदना कुठे होत्या, असा सवालही त्यांनी केला़ दुष्काळाची परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरले आहे़ मुख्यमंत्री आता सहकार्याची भूमिका बोलत असले तरी त्यांचा प्रयत्न कृतीत उतरत नाही. त्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावून दुष्काळ उपाययोजनांवर चर्चा करावी. केंद्र सरकारकडून निधी आणण्यासाठी पंतप्रधानांकडे चला, असे आम्ही सातत्याने सरकारला सांगत आहोत. राज्याचा दबावगट निर्माण केल्याशिवाय पर्याय नाही. परंतु सरकारकडून प्रतिसादच मिळाला नाही. पाण्याचा प्राधान्यक्रम ठरलेला असतानाही राज्य सरकारमधील मंत्र्यांची याबाबत एकवाक्यता नाही. पिण्याच्या पाण्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट असले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)