शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

राज्यात गारठा; मुंबईत उकाडा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 6:12 AM

मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा : कमाल तापमान ३५.५ अंश सेल्सिअस

मुंबई : राज्य थंडीने काही अंशी का होईना गारठले असतानाच दुसरीकडे मुंबईकरांना मात्र ऊन आणि उकाड्याने घाम फोडला आहे. बुधवारी राज्यात अहमदनगर येथे सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. नगरचे किमान तापमान १० अंश नोंदविण्यात आले असतानाच मुंबईचे कमाल तापमान ३५.५ अंश नोंदविण्यात आले आहे. परिणामी, राज्यात गारठा तर मुंबईत उकाडा अशी स्थिती असून मुंबईकर अद्याप थंडीच्या प्रतीक्षेत आहेत.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी राज्यात सर्वांत कमी किमान तापमान अहमदनगर येथे १० अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे.

कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात, विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.दोन दिवस राज्यातील हवामान कोरडे२९ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. मुंबई आणि आसपासच्या परिसराचा विचार करता २९, ३० डिसेंबर रोजी किमान तापमान ३६, २० अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.शहरांचे किमान तापमान (अंश सेल्सिअस)मुंबई १९.६अलिबाग २०रत्नागिरी १९पणजी २१.२डहाणू २०.५पुणे ११.४अहमदनगर १०जळगाव १५कोल्हापूर १६.८महाबळेश्वर १४.६मालेगाव १४.८नाशिक ११.६सांगली १३.३सातारा १२.९सोलापूर १७.५औरंगाबाद १०.६परभणी १२.७नांदेड १५अकोला १३.३अमरावती १४.२बुलडाणा १५.४चंद्रपूर १५.४गोंदिया १३.५नागपूर ११.३वर्धा १२.५यवतमाळ १२.४

टॅग्स :Heat Strokeउष्माघात