शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

१५१ जणांची सामूहिक दशक्रिया

By admin | Published: August 11, 2014 3:18 AM

माळीण दुर्घटनेत मरण पावलेल्या १५१ जणांचा माळीण फाट्यावर बुब्रानदी काठी सकाळी सामूहिक दशक्रिया विधी झाला

घोडेगाव : माळीण दुर्घटनेत मरण पावलेल्या १५१ जणांचा माळीण फाट्यावर बुब्रानदी काठी सकाळी सामूहिक दशक्रिया विधी झाला. या वेळी पाच ते सहा हजार लोकांचा समुदाय येथे जमला होता. सर्व मृतांचे एकच पिंड बनवून दशक्रिया विधी करण्यात आला. या वेळी ह.भ.प. वैभवमहाराज राक्षे यांचे प्रवचन झाले. या वेळी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाधिकारी सौरभ राव आदी उपस्थित होते.या भागातील आदिवासींना दरवर्षी पावसाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तींना सामोरे जावे लागते, त्यातूनही हे लोक पुन्हा उभे राहतात; त्याप्रमाणे माळीण गावही उभे राहील. ग्रामस्थांचे पुनर्वसन, उपजीविकेचे साधन यासाठी सर्व मदत केली जाईल, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.माळीणमध्ये १५१ लोकांचा स्मृतिस्तंभ, स्मारक उभे केले जाईल. गाव जे सांगेल तसे पुनर्वसन केले जाईल, अशी ग्वाही पिचड यांनी दिली. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे एलआयसीकडे दावे करण्यासंदर्भात वारसदारांना आवश्यक ती मदत केली जाईल व लोकांना लवकरात लवकर याचे पैसे दिले जातील, असे विकास अधिकारी रघुनाथ काकडे यांनी सांगितले. या वेळी संजय झांजरे या युवकाने माळीण दुर्घटनेत मदत केलेल्या सर्व लोकांचे आभार मानले. (प्रतिनिधी)