शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

रोडपालीतील खाडीचा रंग बदलला

By admin | Published: January 18, 2017 3:07 AM

तळोजा एमआयडीसीमधील रसायनमिश्रित पाणी कासाडी नदीत सोडले जाते.

अरुणकुमार मेहत्रे,

कळंबोली- तळोजा एमआयडीसीमधील रसायनमिश्रित पाणी कासाडी नदीत सोडले जाते. हे पाणी रोडपालीला खाडीला मिळते. त्यामुळे खाडीचा काही भाग पूर्णपणे काळा झाला असून परिसरात दुर्गंधी पसरत आहे.प्रदूषित पाण्यामुळे मँग्रोज, मासे तसेच जलचरांवर परिणाम होत आहे. याबाबत प्रदूषण महामंडळाकडे वारंवार तक्र ार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तळोजा एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखाने आहेत. येथील काही कारखाने रसायनमिश्रित पाणी सीईटीपीला न देता पावसाळी नाल्यात सोडतात. ते पाणी पाताळगंगा नदीला जावून मिळते. काही कारखाने थेट नदीपात्रात सांडपाणी सोडत असल्याच्या तक्रारी येत आहेत. वादाच्या भोवऱ्यात असलेले औद्योगिक सांडपाण्यावरही शास्त्रशुध्द पध्दतीने प्रक्रि या न करता ते कामोठे खाडीत सोडले जाते. यात घातक रसायने असल्याने उग्र वास येतो. यामुळे रोडपालीत राहणाऱ्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तळोजा-लिंक रोडवर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनाही या दुर्गंधीचा त्रास होऊ लागल्याचे येथील रहिवासी सुनील गोतपगार यांनी सांगितले. टोलेजंग इमारतीत लाखो रूपयांची गुंतवणूक करून या ठिकाणी घर खरेदी केले. मात्र रात्रीच्या वेळी आपण नेमके एमआयडीसीत राहतो की वसाहतीत असा प्रश्न पडत असल्याची प्रतिक्रिया सागर वीरकर या रहिवाशाने दिली. रोडपाली येथे नवी मुंबई पोलीस मुख्यालय आहे. तिथे जवळपास एक हजार पोलीस कर्मचारी काम करतात. त्यांनाही खाडीतून येणाऱ्या उग्र वासाचा त्रास होतो. डोळ्याला चुरचुरणे, डोकेदुखी आदी तक्रारी येत असल्याचे एका पोलीस कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांच्याही त्याच तक्र ारी आहेत. पाताळगंगा नदी व कामोठे खाडीत दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू होत आहे. तसेच पाण्यातील इतर जलचर व वनस्पतींवर परिणाम होतो. रसायनयुक्त पाण्यामुळे सध्या कामोठे खाडी पूर्णपणे काळी झाली आहे. कुठेच पाणी दिसत नाही, चारही बाजूने रसायनाचा तवंग नजरेस पडतोय. पनवेल-सायन महामार्गावरून जाणाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास होतो. कित्येक ठिकाणी मँग्रोज जळालेले दिसते. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघड चालला आहेच. इतकी गंभीर वस्तुस्थिती असतानाही प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्याचे परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे. ।रोडपालीमधील सर्वच रहिवासी उग्र वासाने त्रस्त आहेत. सकाळी धूर, धुके आणि प्रदूषणामुळे तर श्वास घेणेही कठीण जाते. येथील रहिवाशांमध्ये याबाबत तीव्र नाराजी आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. - चंद्रकांत राऊत, अध्यक्ष, रोडपाली एकता सामाजिक सेवा संस्थासध्या या विभागाचा पदभार माझ्याकडे नाही. रासायनिक सांडपाण्यामुळे पाताळगंगा व कासाडी खाडीचे पाणी प्रदूषित होत आहे. मात्र याबाबत अद्याप तक्रार नाही, काही तक्रारी आल्यास त्याबाबत निवारण करण्यात येईल. - तानाजी यादव, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण महामंडळ