शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

उद्योगांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी समिती; सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 12:51 IST

अभ्यास करून मुख्य सचिवांना १० जूनला देणार अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा सरकार अभ्यास करणार असून त्यासाठी सरकारने उद्योग विभागाच्या विकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सहा अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती अभ्यासानंतर येत्या १० जून रोजी मुख्य सचिवांना आपला अहवाल सादर करणार आहे.

या समितीमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागाचे सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे येथील जमाबंदी आयुक्त आणि संचालक, मुंबईतील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव तसेच नगररचना आणि मुल्य निर्धारण विभागाचे संचालक या पाच जणांचा समावेश आहे.

राज्य सरकारने नेमलेली ही अभ्यास समिती राज्यात सध्या उपलब्ध असलेल्या औद्योगिक भूखंडाची माहिती पोर्टलवर उपलब्ध करून देणार आहे. तसेच वापरात नसलेल्या औद्योगिक भूखंडाचा वापर करणे, वापरात नसलेले भूखंड पुन्हा ताब्यात घेऊन त्यांचे पुर्नवाटप करणे, एमआयडीसी बाहेरील औद्योगिक समुहांना पायाभूत सुविधा पुरविणे, राज्यातील उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध उपद्रवी घटकांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना सुचविणे, औद्योगिक क्षेत्राजवळच्या जागेचा निवासी वापर करणे, त्याचबरोबर उद्योगांच्या सहकार्याने राज्यातील बेरोजगार युवकांना उद्योगांशी संबंधित कौशल्य प्रशिक्षण देणे आदी गोष्टींचा अभ्यास ही समिती करणार आहे.

निष्कर्षानुसार सरकार उपाययोजना करणार

राज्यातील उद्योग परराज्यात जात असल्याप्रकरणी विरोधकांकडून सातत्याने महायुती सरकारवर टीका केली जात आहे. राज्य सरकार उद्योगांना योग्य ती वागणूक देत नाही, हव्या असलेल्या सवलती मिळत नाहीत, अशा प्रकारची टीकाही होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्यांचा अभ्यास करणार आहे. या अभ्यासातून जे निष्कर्ष समोर येतील त्यादृष्टीने सरकार पुढे उपाययोजना करणार आहे. यातून राज्यातील उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रbusinessव्यवसाय