शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

कम्युनिस्टांचे सरकार म्हणजे राजकीय हत्याकांड

By admin | Published: June 22, 2017 5:44 AM

कम्युनिस्ट विचारधारा असणाऱ्या पक्षांचे सरकार जिथे आहे, तिथे मोठ्या प्रमाणावर राजकीय हत्याकांड घडतात.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कम्युनिस्ट विचारधारा असणाऱ्या पक्षांचे सरकार जिथे आहे, तिथे मोठ्या प्रमाणावर राजकीय हत्याकांड घडतात. विशेष म्हणजे या राजकीय हत्याकांडाचा कधी तपास होत नाही किंवा खुनीही सापडत नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कम्युनिस्टांवर टीका केली. ‘त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा - माणिक सरकार’ या पुस्तक प्रकाशनानंतर मुख्यमंत्री बोलत होते. पूर्वोत्तर राज्यातील त्रिपुरा या राज्यात चार दशकांपासून कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (मार्क्सवादी)ची सत्ता आहे. तर, १९९८पासून माणिक सरकार या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. या राजवटीवर पत्रकार दिनेश कानजी यांनी लिहिलेल्या ‘त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा - माणिक सरकार’ या पुस्तकाचे स्वातंत्र्यवीर स्मारकात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार, अतुल भातखळकर, माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर आदी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांचा खरा चेहरा आणि दाखवायचा चेहरा भिन्न आहे. देशविघातक शक्तींना प्रोत्साहन देणारे हे सरकार आहे. राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करून देशाच्या सुरक्षेशी खेळणारे आणि केंद्रातून येणारा निधी लुटणारे सरकार आहे. कम्युनिस्टांनी त्रिपुरातही राजकीय हत्याकांडे घडवली. दुर्गम प्रदेश असल्याने संपर्काच्या साधनांचा अभाव आणि मागासलेपणामुळे येथील भीषण वास्तव बाहेरच्या लोकांपर्यंत पोहचत नाही. त्रिपुरातील या अराजकतेचा या पुस्तकातून पर्दाफाश झाला आहे.माणिक सरकार म्हणजे ‘तो मी नव्हेच’ या नाटकातील लखोबा लोखंडे आहे. या माणसांना मी एकेकाळी देवदूत समजत होतो. हे पुस्तक वाचल्यानंतर प्रतिमाभंजन होऊन माणिक सरकार यांचे खरे रूप समोर येते, असे भारतकुमार राऊत म्हणाले.