शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

पाणीकपात रद्द करण्यावरून युतीत स्पर्धा

By admin | Published: July 17, 2016 5:35 AM

तलावांमध्ये जलसाठा दररोज वाढत असल्याने वर्षभराचा निम्मा साठा सुरक्षित झाला आहे़ त्यामुळे लवकरात लवकर पाणीकपात रद्द करून, त्याचे श्रेय खिशात घालण्यासाठी शिवसेना व भाजपामध्ये

 मुंबई : तलावांमध्ये जलसाठा दररोज वाढत असल्याने वर्षभराचा निम्मा साठा सुरक्षित झाला आहे़ त्यामुळे लवकरात लवकर पाणीकपात रद्द करून, त्याचे श्रेय खिशात घालण्यासाठी शिवसेना व भाजपामध्ये रस्सीखेच सुरू आहे़ पाणीकपात मागे घेण्यासाठी भाजपाने मागणी केल्यामुळे प्रशासनावर दबाव टाकून पाणीकपात सर्वात आधी रद्द करून घेण्यासाठी शिवसेनेची धावपळ सुरू झाली आहे़ गेल्या काही दिवसांमध्ये प्रमुख तलावांत सुमारे सात लाख दशलक्ष लीटर्स जलसाठा जमा झाला आहे़ गतवर्षीच्या तुलनेत हा जलसाठा चार लाख दशलक्ष लीटर्सहून अधिक आहे़ त्यामुळे पाणीकपात रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे़ पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असल्याने जास्तीत जास्त विकास कामांचे श्रेय खिशात घालण्यासाठी युतीमध्ये चढाओढ सुरूआहे़ बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत भाजपा सदस्याने पाणीकपात मागे घेण्याची मागणी परस्पर केली़ त्यामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता असून, सभागृह नेता तृष्णा विश्वासराव यांनी तत्काळ आयुक्तांना पत्र लिहून पाणीकपात मागे घेण्याची मागणी शनिवारी केली़ (प्रतिनिधी)पुरेसा पाणीसाठा- मुंबईत दररोज ३,७५० दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा केला जातो़ आॅगस्ट २०१५ पासून २० टक्के पाणीकपात लागू आहे़ गेल्या वर्षी आजच्या तारखेला तलावांमध्ये दोन लाख ७८ हजार दशलक्ष लीटर जलसाठा होता़, या वर्षी आता सहा लाख ९८ हजार दशलक्ष लीटर जलसाठा आहे़