शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

कोल्हापूरातील ४८ हजार शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2017 1:41 AM

कोल्हापूरातील शेतकऱ्यांना वार्षिक पीक कर्ज मर्यादेइतकीच कर्ज माफी देऊन त्यापेक्षा अधिक कर्जमाफी दिली असल्यास ती वसूल करण्यात यावी, हा नाबार्डने कोल्हापूर

मुंबई : कोल्हापूरातील शेतकऱ्यांना वार्षिक पीक कर्ज मर्यादेइतकीच कर्ज माफी देऊन त्यापेक्षा अधिक कर्जमाफी दिली असल्यास ती वसूल करण्यात यावी, हा नाबार्डने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (केडीसीसी) दिलेला आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केला. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे कोल्हापूरातील ४८ हजार अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पीककर्ज मर्यादा हा कर्ज वसूल करण्यासाठी निकष असू शकत नाही, असे म्हणत न्या. आर. एम. बोर्डे व न्या. अजय गडकरी यांनी कर्ज वसूल करण्याचा नाबार्डचा निर्णय रद्द केला.२००८ मध्ये केंद्र सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे पीक कर्ज रद्द करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूरमधील सुमारे ४८ हजार अल्पभूधारक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या या धोरणाचा लाभ घेतला. पंरतु, २०१२ मध्ये काही लोकांनी नाबर्डकडे या योजनेचा काही शेतकऱ्यांनी गैरफायदा घेतल्याची तक्रार केली. त्यावरून नाबार्डने केडीसीसी बँकेला लेखापरीक्षण करण्याचे आदेश देत ज्यांनी पीककर्ज मर्यादेपेक्षा अधिक कर्ज घेतले आहे, त्या शेतकऱ्यांकडून अधिकची रक्कम वसूल करण्यात यावी, असे फर्मान काढले. नाबार्डच्या या आदेशाला शेतकऱ्यांनी अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत उच्च न्यायालयात आव्हान दिले. मूळ धोरणात केंद्र सरकारने संपूर्ण कर्जमाफी, असे नमूद केले आहे. मात्र नाबार्डने पीक कर्जाचा निकष लावून ४८ हजार शेतकऱ्यांकडून सुमारे १११ कोटी रुपये वसूल करण्याचा निर्णय घेतला. नाबार्डचा कर्जवसुलीचा निर्णय बेकायदेशीर व मनमानी असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील प्रसाद ढाके-फाळके व धैर्यशाील सुतार यांनी केला. ‘रेकॉर्ड्सची खाडाखोड करून अपात्र शेतकऱ्यांनाही कर्ज माफीसाठी पात्र करण्यात आले. काही बोगस खाती काढण्यात आली. त्यामुळेच नाबार्डने अतिरिक्त कर्ज वसूल करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने तटस्थ राहत भूमिका स्पष्ट केली. संबंधित शेतकऱ्याचे कर्ज १९९७ ते २००७ या दरम्यान पीक कर्जच घेतलेले असावे आणि फेब्रुवारी २००८ पर्यंत त्याने कर्जाची परतफेड केलेली नसावी, अशा अटी केंद्र सरकारने पीक कर्ज माफ करताना घातल्या होत्या,’ सोमवारी निकाल देताना खंडपीठाने हा निकाल शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन देण्यात येत आहे, असे म्हटले.‘बँकेने कर्जवसुलीसाठी पीक कर्ज मर्यादेचा लावलेला निकष गैर असल्याने कर्ज वसुलीसाठी हा निकष लागू शकत नाही,’ असे खंडपीठाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी) अपात्र कर्जमाफीविरोधात कृती समितीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांची व्यथा मांडली, त्याला यश आल्याचा आनंद होत आहे. - अनिल यादव, प्रमुख, अपात्र कर्जमाफी कृती समिती.न्यायालयाने शेतकऱ्यांच्या हिताची बाजू घेत कर्जमाफीचा लाभ मिळवून दिला.- अ‍ॅड. धैर्यशील सुतार, याचिकाकर्त्यांचे वकील.