शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सवलती

By admin | Published: March 19, 2017 1:41 AM

राज्यातील ३१ लाख शेतकऱ्यांकडे कर्जाची थकबाकी असली तरी एक कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कर्जफेड वेळेत केलेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना

मुंबई - राज्यातील ३१ लाख शेतकऱ्यांकडे कर्जाची थकबाकी असली तरी एक कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कर्जफेड वेळेत केलेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना सवलती देताना या दोघांनाही त्या देण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने काल नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन कर्जमाफी व इतर सवलतींसाठी साकडे घातले होते. त्या विषयीचे निवेदन विरोधकांच्या गदारोळातच मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत केले. ते म्हणाले की, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार जी योजना तयार करेल त्यात राज्य सरकारदेखील आर्थिक भार निश्चितपणे उचलेल. ३१ लाख शेतकऱ्यांकडे ३० हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज थकित आहे पण एकूण शेतकरी खातेदारांची संख्या १ कोटी ३४ लाख इतकी आहे. याचा अर्थ एक कोटींपेक्षा जास्त शेतकरी वेळेत कर्ज परतफेड करीत आहेत. ज्यांनी कर्ज वेळेत भरले त्यांना सवलती दिल्या नाहीत आणि कर्ज न भरणाऱ्यांना त्या दिल्या तर भविष्यात कर्ज न भरण्याची प्रवृत्ती बळावेल. त्यामुळे सवलती देताना दोघांमध्ये भेद केला जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आज सभागृहात जे गोंधळ घालत आहेत त्यांच्यामुळे शेतकऱ्यांची गेल्या १५ वर्षांत वाईट अवस्था झाली होती. आज केवळ घोषणाबाजी करून ते शेतकऱ्यांचे कैवारी ठरू शकत नाहीत, असेही मुख्यमंत्र्यांनी सुनावले. (विशेष प्रतिनिधी)