शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

संघर्ष यात्रावाल्यांची संपाला चिथावणी

By admin | Published: June 02, 2017 4:10 AM

संघर्ष यात्रेला अजिबात प्रतिसाद न मिळालेले लोक आता शेतकऱ्यांना संपासाठी चिथावणी देत असून, या संपाला हिंसेचे गालबोट

विशेष प्रतिनिधी/लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : संघर्ष यात्रेला अजिबात प्रतिसाद न मिळालेले लोक आता शेतकऱ्यांना संपासाठी चिथावणी देत असून, या संपाला हिंसेचे गालबोट लागावे, असा त्यांचा प्रयत्न असल्याची टीका करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री म्हणाले की, संपाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. हा संप स्वयंस्फूर्त नाही. शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक अडवणूक केली जात आहे. ज्यांच्या संघर्ष यात्रेला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही ते लोक संपाच्या आड हिंसाचार पसरविण्याचा आणि शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकरी उत्पादकता अधिक असेल तर स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींचा फायदा होतो. महाराष्ट्रात उत्पादकता कमी असल्याने या शिफारशींचा किती फायदा होईल, याचा विचार करावा लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांचा पोलिसांशी संघर्ष व्हावा, संपाला गालबोट लागावे, तो चिघळावा असेही प्रयत्न होत आहेत. दूध, भाजीपाला रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचेच नुकसान आहे. अहमदनगर जिल्ह्यातील काही दूध संघांनी दुधाचे संकलन केले नाही. त्यांना माझे आवाहन आहे की, शेतकऱ्यांकडून २० रुपयांत दूध खरेदी करून मुंबईत ते ७० रुपयांना विकणाऱ्या नेत्यांनी शेतकऱ्यांना अधिकचा भाव द्यावा. संपकरी शेतकऱ्यांशी चर्चेची सरकारची कोणत्याही क्षणी तयारी आहे. आज त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या पूर्ततेसाठी शासनाने आधीच उपाययोजना हाती घेतलेल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. राजू शेट्टी यांनी संपाला पाठिंबा दिला आहे, याकडे लक्ष वेधले असता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी राजकारण करू नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर आणि सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख या वेळी उपस्थित होते.दुधाचा प्रश्न हा गेल्या १५-२० वर्षांमधील धोरणाचा परिपाक आहे. नेत्यांचे दुधाचे ब्रँड मजबूत झाले आणि सरकारचा ब्रँड कमकुवत करण्यात आला. शेतकऱ्यांची पिळवणूक करून नेत्यांचे दूध संघ तेजीत आले.