शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
2
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
3
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
4
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
5
बॉलिवूडचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली, आता आमदारकीचे वेध; कोण आहे 'ही' अभिनेत्री?
6
उमेदवार बदला नाहीतर जागा लढवा; देवगिरी बंगल्यात NCP कार्यकर्ते जमले, काय आहे वाद?
7
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...
9
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
11
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
12
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
13
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
15
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
16
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 
17
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
18
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीने आता मागितली माफी, म्हणाला...
19
MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
20
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?

‘अवकाळी’वरील गोंधळ अर्धा तासच टिकला

By admin | Published: March 11, 2015 1:51 AM

राज्यात पडलेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची चर्चा बाकीचे कामकाज बाजूला सारून आधी घ्या, अशी मागणी करीत काँग्रेस

मुंबई : राज्यात पडलेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची चर्चा बाकीचे कामकाज बाजूला सारून आधी घ्या, अशी मागणी करीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मंगळवारी विधानसभेत आक्रमक झाले खरे पण या मुद्यावरून त्यांचा गोंधळ केवळ अर्धा तास टिकला. विरोधकांनी सभात्याग केला. सरकारने आपल्या इच्छेनुसार कामकाज पूर्ण केले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आधी अवकाळी पावसाच्या नुकसानीची चर्चा करा, अशी मागणी केली. विरोधीपक्षनेते विखे पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी चर्चेची मागणी कायम ठेवली. विरोधी सदस्यांनी सरकार आणि अध्यक्षांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. अध्यक्षांचा धिक्कार करणे हा सभागृहाचा अवमान असल्याचे सांगून, ‘माफी मागा नाही तर यांना निलंबित करा’, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हणताच गोंधळ अधिक वाढला. विरोधकांना केवळ राजकारण करायचे आहे, असे सांगत शिवसेनेचे गुलाबराव पाटील सरकारच्या बचावासाठी धावले. या गदारोळात अध्यक्षांनी कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केले. ते पुन्हा सुरू झाल्यानंतरही गोंधळ सुरूच राहिला. विरोधक बाहेर पडल्यानंतर कामकाज सुरूच राहिले. अशाप्रकारे बाकीचे कामकाज थांबवून अवकाळीवर चर्चा घडवून आणण्यात विरोधकांना यश आले नाही. शेवटी सत्तापक्षाने या विषयावर नियम २९३ नुसार आणलेल्या प्रस्तावावर चर्चेला सुरुवात झाली. (विशेष प्रतिनिधी)