शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

काँग्रेसने ७२ वेळा संविधान तोडले- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 23:23 IST

काँग्रेस समाजात गैरसमज पसरवून भोळ्या आणि गरीब जनतेला भीती दाखवून मतांचे राजकारण केले.

भंडारा : ६० वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसनेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान ७२ वेळा तोडले. भाजपाने कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही, तरीही काँग्रेस समाजात गैरसमज पसरवून भोळ्या आणि गरीब जनतेला भीती दाखवून मतांचे राजकारण केले, असा आरोप केंद्रीय महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केला.भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार हेमंत पटले यांच्या प्रचारार्थ भंडारा येथे आयोजित जाहीरसभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा.डॉ.विकास महात्मे, माजी खा.शिशुपाल पटले, उमेदवार हेमंत पटले, आ. रामचंद्र अवसरे, आ.विकास कुंभारे, आ.मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हाध्यक्ष तारीक कुरेशी, नागपूरचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार, विकास तोतडे, नगराध्यक्ष सुनील मेंढे, डॉ.प्रकाश मालगावे, रोशनी पटेल, अविनाश ठाकरे, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे उपस्थित होते.रामभाऊ अस्वले, लक्ष्मणराव मानकर, श्यामरावबापू कापगते, बापूसाहेब लाखनीकर या कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भाजपचा विचार समाजात पोहोचवल्याचे सांगून ना.गडकरी म्हणाले, त्यावेळी मानसन्मान मिळत नव्हता, प्रतिष्ठा नव्हती तरीही या कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम केले. अशा असंख्य कार्यकर्त्यांचा हा पक्ष असून त्यानंतर नवीन लोकांना पक्षाशी जोडण्याचा निर्णय घेतला. त्यांना सामावून घेतले. अशावेळी नाना पटोले आमच्याकडे आले. प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करण्यासाठी मला लोकसभेची उमेदवारी द्या, अशी मागणी केली. आम्ही सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांना उमेदवारी दिली. प्रचंड मतांनी ते निवडूनही आले होते. परंतु आता मात्र प्रफुल्ल पटेल यांचा झेंडा घेऊन ते मते मागत आहेत. राजकारण हे विचारासाठी असते. विचारात मतभेद समजू शकतात पण मनभेद नको. ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि कार्यकर्तेच आमची ताकद असल्याचेही ना.गडकरी म्हणाले.महाराष्ट्राला मी १ लाख कोटी रूपये दिले. ४४० कोटींचा गोसेखुर्द प्रकल्प १८ हजार कोटींचा कसा झाला हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला विचारा? आमच्याबद्दल खोटा प्रचार, जातीयतेचे विष लोकांच्या मनात कालवून, भीती दाखवून मते मागितली जातात. पण सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय प्रस्थापित केल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही, असेही नितीन गडकरी म्हणाले. 

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरी