शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मलकापुरात काँग्रेसने लावला सुरुंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 12:47 IST

विरोधकांना आजपर्यंत संचेती यांच्या विरोधात ५० हजाराच्या मतांचा टप्पा सुद्धा पार करता आला नव्हता.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. मात्र असे असले तरीही भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मलकापुरात यावेळी काँग्रेसने विजयाचा झेंडा फडकावला आहे. सलग पाच वेळा निवडून येणारे व भाजपचे उमेदवार चैनसुख संचेती यांचा विजयाचा रथ यावेळी काँग्रेसचे उमेदवार राजेश एकाडे यांनी रोखले आहे.

भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मलकापूरमध्येचैनसुख संचेती यांनी आपल्या मतदारसंघात भाजपचा विजयाचा झेंडा अबाधित ठेवला होता. १९९५ पासून आजपर्यंत संचेती यांनी मतदारसंघाच नेतृत्व आपल्याकडे कायम ठेवले होते. पहिल्यांदा अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवणाऱ्या संचेती यांनी नंतर भाजपच्या तिकीटावर कायम निवडणूक लढवत विजयाची मालिका कायम ठेवली. काँग्रेसने प्रत्येकवेळी नवीन चेहरा देऊन संचेती यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांना आजपर्यंत संचेती यांच्या विरोधात ५० हजाराच्या मतांचा टप्पा सुद्धा पार करता आला नव्हता.

विधानसभा निवडणुकीत मात्र यावेळी संचेती यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. काँग्रेसकडून रिंगणात असलेल्या राजेश एकाडे यांनी यावेळी भाजपाचे उमेदवार चैनसुख संचेती यांच्या विजयी षटकाराला धक्कादायक रित्या रोखले आहे. गत पंचवीस वर्षापासून आमदार चैनसुख संचेती यांच्या रूपाने भाजपाचे वर्चस्व अबाधित राहिलेल्या मलकापूर विधानसभा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात आले आहे.

गेल्या सहा विधानसभा निवडणुकीपासून या मतदारसंघातून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात होते. प्रत्येकवेळी काँग्रेसने येथून नवीन चेहरा देऊन पाहिला.मात्र काँग्रेसला विजय मिळवता आला नव्हता. यावेळी सुद्धा भाजपने या मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या जाहीर सभा घेत आपला गड कायम राखण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेसचे राजेश एकडे यांच्या विजयाने भाजपाची सारी राजकीय समीकरणे फोल ठरवली.